ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जि. प. बाहेर धरणे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जि. प. बाहेर धरणे आंदोलन
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जि. प. बाहेर धरणे आंदोलन

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जि. प. बाहेर धरणे आंदोलन

sakal_logo
By

२५ ( पान २ साठी)

-rat२८p२३.jpg-
९९१४१
रत्नागिरी ः जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारापाशी धरणे आंदोलन करताना ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
--
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

रत्नागिरी, ता. २८ ः जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन, विशेष राहणीमान भत्ता व ग्रामपंचायत उत्पन्नानुसार ७५ टक्के व ५० टक्के होत असलेल्या वेतनाचा उर्वरित हिस्सा ग्रामपंचायतींनी अदा करावा, या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने धरणे आंदोलन केले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना परिमंडळनिहाय सुधारित किमान वेतन लागू करून १ जुलै २००७ पासून लागू असलेला थकित राहणीमान भत्ता मिळणे आवश्यक आहे; परंतु अद्यापही पूर्तता झालेली नाही. मागील किमान वेतन उशिरा अदा केले असल्यामुळे वेतन व राहणीमान भत्ता फरक मिळालेला नाही. शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या विविध सेवा सवलतींची जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर शासन निर्णयाची पायमल्ली होत आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेवर महासंघाने वेळोवेळी आंदोलने केली आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्याकरिता शासनाकडून एक हजार रुपये मानधन जाहीर केले होते. त्याचीही पूर्तता अद्याप करण्यात आली नसल्याबाबत या वेळी आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.
राज्याचे संघटक सखाराम दुर्गूडे, जिल्हाध्यक्ष किरण पांचाळ, उपाध्यक्ष संजय खताते व जिल्हा सरचिटणीस कृष्णा होडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. प्रोव्हिडंट फंड थकित रक्कमा खात्यावर जमा करणे व १० टक्के आरक्षण सेवा ज्येष्ठता यादीतून वगळलेली नावे पूर्ववत व्हावीत याकरिता तक्रार निवारण बैठकीचे आयोजन व्हावे, या मागण्या या वेळी करण्यात आल्या. सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी व अर्जित रजेचा लाभ मिळावा, ओळखपत्र मिळावे, मयत किंवा सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्राधान्याने ग्रामपंचायत सेवेत सामावून घ्यावे, कर्मचाऱ्यांना जोखमीची कामे, दिवाबत्ती, पाणीपुरवठा मोटार व इतर जोखमीचे काम करावे लागत असल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना विमा कवचचा लाभ मिळावा.