ठाकरेंनी पत्र लिहिण्याआधी स्थानिकांचा विचार करायला हवा

ठाकरेंनी पत्र लिहिण्याआधी स्थानिकांचा विचार करायला हवा

पान २ साठी

ठाकरेंनी स्थानिकांचा
विचार करायला हवा होता
उदय सामंत; संशय दूर झाल्याशिवाय प्रकल्प रेटणार नाही
रत्नागिरी, ता. २८ ः रिफायनरी प्रकल्पाला नाणारऐवजी बारसू येथील जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ जानेवारी २०२२ ला केंद्राला पत्र लिहून सुचवली होती. ते पत्र लिहिण्याआधी स्थानिकांचा विचार करायला हवा होता. त्या वेळी ग्रामस्थांना विचारून पत्र देणे गरजेचे होते; पण त्या पत्रानुसार आता सर्वेक्षण सुरू झाले तर आंदोलनकर्त्यांच्या बाजूने आपण आहोत, हे दाखवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न केविलवाणा आहे, असा आरोप पालकमंत्री उदय सामंत यांनी केला.
मंत्री सामंत म्हणाले, ‘‘प्रशासनाचे अधिकारी लोकांशी चर्चा करायला तयार आहेत. चर्चा सुरूही आहे. गवताला आंदोलनकर्त्यांनी आग लावली तो विझवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. अश्रुधुराचा वापर केला नाही. प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण सुरू आहे. अद्याप प्रकल्प करायचा की नाही हे ठरलं नाही. कुठेही पोलिस कारवाईचा बडगा करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. काम करणारी माणसेच आहेत. चर्चेला वाव आहे. माती सर्वेक्षण झाल्यानंतरच प्रकल्प तिथे येणार की नाही, हे कळेल. शेतकऱ्यांची माथी कोण भडकवतंय, हे सगळ्यांना माहिती आहे; परंतु राज्याच्या उद्योगधंद्याच्यादृष्टीने हे चिंताजनक आहे. शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, लोकांच्या मनातील सर्व शंका दूर करण्यास सरकार तयार आहे. लोकांना जे आवश्यक आहे ते करायला तयार आहे. माती परीक्षण झाले म्हणजे प्रकल्प होणार असं नाही अद्याप पुरेसा वेळ आहे, लोकांची चर्चा सुरू आहे. आम्हीदेखील तिथे जाऊ शकलो असतो; परंतु राजकीय वातावरणामुळे तणाव आणखी बिघडेल म्हणून सरकार काळजी घेत आहे. लोकांच्या मनातील संशय दूर झाल्याशिवाय सरकार प्रकल्प पुढे रेटून नेणार नाही, असंही आश्वासन पालकमंत्री सामंत यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com