मूठभर धान्य, घोटभर पाणी पक्ष्यांसाठी

मूठभर धान्य, घोटभर पाणी पक्ष्यांसाठी

99989
कट्टा ः उपक्रमासाठी संस्थाध्यक्ष अजयराज वराडकर यांच्याकडे मातीची भांडी सुपूर्द करताना निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कानूरकर. सोबत इतर.

मूठभर धान्य, घोटभर पाणी पक्ष्यांसाठी

कट्टा महाविद्यालयात उपक्रम; विद्यार्थ्यांचा पशु-पक्ष्यांसाठी पुढाकार

ओरोस, ता. २ ः वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा (ता. मालवण) आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मूठभर धान्य, घोटभर पाणी पक्ष्यांसाठी’, या उपक्रमांचा प्रारंभ कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या हस्ते झाला. या उपक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्र दिनी झाला.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश कानूरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा प्रारंभ सर्व विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांना मातीचे भांडे देऊन करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून प्राणी, पक्षी उष्माघाताच्या आघाताने अन्नपाण्याविना मृत होऊ नयेत, जैव विविधतेला नुकसान पोहचू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या अंगणात, गच्चीवर पक्ष्यांसाठी अन्न, पाणी पुरविण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले. ठिकठिकाणी पाणवठे तयार करावेत. प्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठीची प्रेरणा व प्रोत्साहन वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक यांनी दिले. तसेच सर्व सहकारी शिक्षकांनी खंबीरपणे साथ दिली. या उपक्रमाचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी कौतुक केले. यावेळी विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, अॅड. एस. एस. पवार, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, स्कूल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर, संचालक महेश वाईरकर आदींनी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
...............
चौकट
वटपौर्णिमेला वृक्षारोपणाचा संकल्प
दहा वर्षांपूर्वी ३५ ते ४० अंश सेल्सिअस असलेल्या तापमानाने आता ४५ अंशांचा टप्पा पार केला आहे. हे प्रमाण पुढील प्रत्येक ५ वर्षांत ४५ ते ५० आणि नंतर ६० अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, तेव्हा झाडेही सुकतील. आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे येत्या वटपौर्णिमेदिनी संस्थेतर्फे १००० वृक्षरोपणाचा संकल्प केला आहे. येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावावीत आणि ३ वर्षे त्यांचे पोटच्या मुलासारखे संगोपन करावे, असे आवाहन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश कानूरकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com