पाणी प्रश्नासाठी सत्ताधारी सरसावले

पाणी प्रश्नासाठी सत्ताधारी सरसावले

पाणी प्रश्नासाठी सत्ताधारी सरसावले

देवगडमध्ये हालचाली; स्वखर्चासह लोकसहभागातून प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ ः येथील देवगड-जामसंडे शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नगरपंचायतीमधील सत्ताधारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेवकांनी स्वखर्चासह लोकसहभागातून दहिबांव येथील अन्नपूर्णा नदी पात्रातील गाळ उपसा करण्याचा संकल्प केला आहे. नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी एक महिन्याचे मानधन यासाठी देऊ केले आहे.

येथील शहराचा पाणी प्रश्‍न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे. नळ योजना उद्भवाच्या दहिबांव येथील अन्नपूर्णा नदी पात्रातील पाणी साठवण क्षमता कमी होत चालल्याने योजनेवर ताण येत आहे. तसेच दहिबांव परिसरातील अन्य गावांसाठीच्या नळ योजनांचे उद्भवाचे ठिकाण तेथेच असल्याने संबधितानाही याची झळ बसत असल्याचे सांगितले जाते. दहिबांव येथील उद्भवाच्या ठिकाणचा पाणीसाठा कमी होऊ लागल्याने देवगड प्रादेशीक नळ योजनेच्या पंपीग करण्याच्या तासात घट केली गेल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळित झाला होता. त्यातच योजनेमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडाचाही परिणाम पाणी वितरणावर होत असल्याने दिवसआड होणारा पाणी पुरवठा चार-पाच दिवसांनी अवेळी होऊ लागला होता. याअनुषंगाने नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत पाणी उपसा करण्याच्या वेळा ठरवल्या आहेत. नदी पात्रातील साचलेला गाळ काढल्यास भविष्यात पाणी साठवण क्षमतेत वाढ होऊन टंचाईची झळ कमी करण्यास मदत होईल याबाबतही चर्चा करण्यात आली. त्यानुसार सत्ताधारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेवकांनी स्वखर्चासह लोकसहभागातून दहिबांव येथील अन्नपूर्णा नदी पात्रातील गाळ उपसा करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी एक महिन्याचे मानधन देऊ केले आहे. अन्य नगरसेवकही याकामी हातभार लावणार आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या माध्यमातून लोकसहभागातून गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नदीतील गाळ उपसा करण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे. गाळ काढल्यावर नदीपात्र खोल होऊन पाणी साठवण क्षमता वाढू शकते.
............
चौकट
असे होईल पंपीग
रात्री ९ ते सकाळी १० या वेळेत एकूण १३ तास देवगड प्रादेशीक नळयोजनेसाठी पंपीग होईल. तर उर्वरित वेळी अन्य योजनांसाठी पंपीग करण्यावर तोडगा निघाला आहे.
............
कोट
शहराचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. दहिबांव येथील अन्नपूर्णा नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी एक महिन्याचे मानधन दिले आहे. अन्य नगरसेवकही हातभार लावतील. लोकसहभागातून गाळ काढू. तसेच नदी पात्रात परिसरातील अन्य नळ योजनाही असल्याने संबधितांनी या कामी हातभार लावल्यास भविष्यात त्यांनाही त्याचा लाभ होऊ शकतो.
- साक्षी प्रभू, नगराध्यक्षा, देवगड-जामसंडे नगरपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com