रत्नागिरी पालिकेच्या आवारात माणुसकीची भिंत

रत्नागिरी पालिकेच्या आवारात माणुसकीची भिंत

rat२४p१६.jpg
०४७३०
रत्नागिरी - पालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रिड्यूस रियुस रिसायल केंद्र स्थापन केले आहे.
rat२४p१७.jpg
०४७३१
नको असलेल्या वस्तू संकलित करून गरजवंतांना त्याचे वाटप केले जाते.
.................
रत्नागिरी पालिकेच्या आवारात माणुसकीची भिंत
शहर स्वच्छतेसाठी मदत; गरजवंताना मिळतात वस्तू
राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत रत्नागिरी पालिकेने रिड्यूस रियुस रिसायल केंद्र (आरआर कॅन्टर) स्थापन केले आहे. या केंद्रामार्फत काही लोकाना नको असलेल्या टाकावू वस्तू घेतल्या जातात आणि त्या गरजवंतांना दिल्या जातात. या केंद्राच्या माध्यमातून माणुसकीची भिंत उभारण्यात येणार आहे. या केंद्राला चांगला प्रतिसात मिळत असून अनेक वस्तू जमा झाल्या आहेत.
रत्नागिरी पालिकेने दोन दिवसांपूर्वीच पालिकेतच हे केंद्र सुरू केले आहे. पालिकेला स्वच्छ भारत अभियानामध्ये देशपातळीवर गौरविण्यात आले आहे. त्यामुळे एकच लक्ष्य शहरे स्वच्छ या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत कचराच होऊ नये, यासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे. आपल्या घरातील जुने कपडे, जुनी पुस्तके, स्वच्छ प्लास्टीक वस्तू , जुनी भांडी, जुनी चप्पल-शुज, इलेक्ट्रॉनिक वेस्ट आदी वस्तू कचरा म्हणून फेकुन दिला जातो. हेच अस्वच्छतेला कारणीभूत ठरते. शहरात त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरते. ही अस्वच्छता टाळण्यासाठी रिड्यूस रियूस रिसायकर केंद्र पालिकेने सुरू केले आहे. या केंद्राच्या मार्फत या टाकावू वस्तू घेतल्या जाणार आहे. त्या गरिब किंवा गरजूंना दिल्या जाणार आहे. यामुळे शहर स्वच्छ राहण्यास साह्य होणार असून गरीबांचा मुलभुत गरजाही भागणार आहेत. यातून नको असेल ते द्या... हवे असेल तर घेऊन जा... अशी ही माणुसकीची भिंत उभारली जाणार आहे.
पालिकेच्या आवारात हे केंद्र उभारले आहे. वस्तू साठविण्यासाठी वेगवेगळे बॉक्स ठेवले आहेत. आतापर्यंत या बॉक्समध्ये कपडे, चपला, बुट, प्लास्टिक, इलेक्टॉनिक वस्तू जमा झाल्या आहेत.

कोट
आपल्या चांगल्या परंतु नको असलेल्या वस्तू आपण टाकुन देतो. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा होतो. हे टाळण्यासाठी रिड्यूस रियुस रिसायल केंद्र (आरआर कॅन्टर) स्थापन केले आहे. दोन दिवसांपूर्वीच हे माणूसकी जपणारे केंद्र उभा केले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गरजू या वस्तू नेत आहेत.
- तुषार बाबर, मुख्याधिकारी रत्नागिरी पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com