पाणीटंचाईमुळे प्रशासन मेटाकुटीस

पाणीटंचाईमुळे प्रशासन मेटाकुटीस

पाणीटंचाईमुळे प्रशासन मेटाकुटीस
खेडः तालुक्यात दिवसागणिक झपाट्याने वाढणाऱ्या टंचाईग्रस्त गाववाड्यांमुळे ग्रामस्थांसह प्रशासन मेटाकुटीस आले आहे. सद्यःस्थितीत टंचाईग्रस्त वाड्यांनी अर्धशतक ओलांडले असून, २३ गावे ५८ वाड्यांना पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. टंचाईग्रस्त गाववाड्यांमध्ये १८० फेऱ्या धावत असून आणखी ३ गावे ४ वाड्या टँकरच्या प्रतीक्षेत असले तरी आता मान्सूनच्या जलधारांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. एक दिवसाआड प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, हे पाणी अपुरे पडत आहे. त्यातच अवघा दिवस पाण्यासाठी वेचताना शेतीच्या मशागतीची कामे रखडली आहेत. तालुक्यात २१ गावे ४८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई होती. अवघ्या १० दिवसात ५ गावे ११ वाड्यांची भर पडली आहे. आष्टी-गुरववाडी, इनरकरवाडी, शिरगाव–येसरावाडी, खवटी-मंडलिककोंड ग्रामस्थ टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. यापूर्वी प्रशासनाकडे अवघा एकच शासकीय टँकर उपलब्ध होता; मात्र आता ३ खासगी टँकर उपलब्ध करूनही संख्या वाढल्याने तहानलेल्या गाववाड्यांना टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. सुकिवलीतील चोरद नदीपात्रातून एकदिवसाआड टँकरने पाणीपुरवठा होत आहे. शासकीय टँकरच्या ११७ तर खासगीच्या ६३ अशा १८० फेऱ्या एक दिवसाआड धावत आहेत.
----------------------------
वळणेत आज काव्य संमेलन
दाभोळः जागरण संस्था व मराठी पत्रकार परिषद दापोली यांच्यावतीने कविश्रेष्ठ केशवसुत स्मारक वळणे येथे काव्य संमेलनाचे आयोजन केले आहे. दापोली तालुक्यातील जालगावजवळ असलेल्या वळणे या गावी कविश्रेष्ठ केशवसुत यांचे घर असून, त्याची दुरवस्था झाली असून काही दिवसांपूर्वी या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची सफाई जागरण संस्थेच्यावतीने श्रमदान करून केली होती. याच ठिकाणी उद्या रविवारी (ता. २८) मे रोजी दुपारी ३.३० ते ६ या वेळेत काव्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
-------------
चारचाकीच्या धडकेत गाईचा मृत्यू
राजापूरः चिरेखाण येथील स्पीड ब्रेकर हटवल्यामुळे तिथे अपघात होऊ लागले आहेत. शुकवारी (ता. २६) सायंकाळी एका चारचाकी गाडीने धडक दिल्यामुळे गायीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. राजापूर तालुक्यातील चिरेखाण आणि कोंबे स्टॉप येथील रस्त्यावर घालण्यात आलेले स्पीड ब्रेकर उंच आहेत. ते अपघाताला कारणीभूत ठरत होते. त्यामुळे वाहनचालकांच्या मागणीनुसार स्पीडब्रेकर हटविले होते. ते हटविल्यानंतर वाहन चालक या मार्गावरून वेगात वाहने हाकत आहेत. गुरूवारी सांयकाळी एका भरधाव चारचाकी गाडीने गायीला जोरदार धडक दिली. या अपघातात गायीचा जागीच मृत्यू झाला. जर स्पीडब्रेकर असता तर हा अपघात झाला नसता अशी चर्चा स्थानिकांकडून केली जात आहे. शासनाने तातडीने स्पीडब्रेकर घालावे, अशी मागणी स्थानिकांनकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com