पंधरा माड किनारी चार दिवसात दगड टाकणार

पंधरा माड किनारी चार दिवसात दगड टाकणार

rat31p20.jpg-
06162
रत्नागिरीः पंधरामाड येथील बंधाऱ्याचे काम थांबले आहे.
-----------
पंधरा माड किनारी चार दिवसात दगड टाकणार
पत्तन अधिकाऱ्यांचे आश्वासन ; सातशे मीटरचे काम अपूर्ण
रत्नागिरी, ता. ३१ः शहराजवळील पंधरा माड परिसरातील सातशे मीटर बंधार्‍याचे काम अपूर्ण ठेवल्यामुळे यंदाच्या पावसात समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर फुटणार आहेत. या भागातून जाणाऱ्या नगरपालिकेच्या रस्त्यासाठी जागा सोडण्यात आलेली नसल्याने हे काम थांबले होते. येथील जमिनीची मोजणी होईपर्यंत बंधाऱ्याची तात्पुरती डागडुजी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पत्तनच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यांनीही चार दिवसात सुरक्षेसाठी दगड टाकले जातील असे आश्‍वासन दिले.
पंधरामाड येथील माजी नगरसेवक राकेश नागवेकर, बंटी कीर आणि अन्य ग्रामस्थांनी बुधवारी (ता. ३१) पत्तन कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली. पावसाळ्यापूर्वी पंधरामाड भागातील संरक्षक बंधाऱ्यावर तात्पुरती डागडुजी करावी, अशी मागणी केली. तसेच दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देणार असल्याचे सांगितले. मिऱ्या बंधाऱ्याच्या साडेतीन किमी किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी नवीन पद्धतीचा बंधारा बांधला जात आहे. येथील अलावा परिसरातील काम वेगाने सुरू आहे; परंतु मुरुगवाडा येथील पंधरामाड किनाऱ्यावरील सातशे मीटरचे काम थांबले आहे. या भागात मागील पाच ते सहा वर्षात मोठ्याप्रमाणात जमिनीची धूप झाली होती. स्थानिक ग्रामस्थाची कंपाऊंड वॉल आणि नारळ वाहून नुकसान झाले आहे. ही धूप थांबवण्यासाठी प्रत्येक वर्षी किनाऱ्यावर मोठ्या दगडी टाकण्यात येतात. सध्या काम सुरू असल्यामुळे कायमस्वरुपी सुरक्षा होणार आहे. त्यामध्ये यापूर्वी टाकलेल्या दगडांवरुनच बंधाऱ्याचे काम केले जात असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सद्यःस्थितीत यापूर्वीच्या सुरक्षेसाठी टाकलेल्या दगडांवरच बंधारा बांधला गेल्यास स्थानिकांच्या जागाही त्यात जातील. मोजणी करणाऱ्या कंपनीकडून योग्य पद्धतीने कार्यवाही केली नसल्याचे माजी नगरसेवक बावा नागवेकर यांनी सांगितले. त्यामुळे प्रथम नगर पालिकेच्या रस्त्याच्या जागेची मोजणी करावी, त्यानंतर या भागातील बंधाऱ्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. तोपर्यंत पावसाळ्यात लाटांच्या तडाख्यात सध्या बांधलेला रस्ता वाहून जाऊ नये आणि किनाऱ्यावरील लोकवस्तीत पाणी येऊ नये यासाठी तात्पुरत्या दगडी टाकून घ्याव्यात, अशी मागणी श्री. नागवेकर यांनी पत्तनच्या अधिकाऱ्यांकडे केली. त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून चार दिवसात ठेकेदाराकडून दगडी टाकल्या जातील असे सांगण्यात आले.

चौकट
मोजणीसाठी पावणेतीन लाख पालिकेकडे वर्ग
पंधरामाड परिसरात ही मोजणी कुणी करायची यावरुन पालिका आणि भूमि अभिलेखमध्ये एकमत होत नव्हते; मात्र आता जमिन मोजणीसाठी पत्तन विभागाने नगर पालिकेकडे २ लाख ७८ हजार रुपये वर्ग केले आहेत. पालिकेकडून ते भूमिअभीलेख कार्यालयाकडे दिले जातील. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. हे सोपस्कार पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मोजणी पावसाळ्यानंतरच अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com