चिपळूण - नोव्हेंबरपासून तीन महिने पाणी टंचाई

चिपळूण - नोव्हेंबरपासून तीन महिने पाणी टंचाई

कोयना प्रकल्प--लोगो

नोव्हेंबरपासून जाणवणार तीन महिने पाणी टंचाई
बोगदा दुरुस्तीचा परिणाम ः चिपळूणसह एमआयडीसी, ग्रॅव्हिटीची योजना असलेल्या गावांना झळ
चिपळूण, ता. २ ः कोयना प्रकल्पाच्या बोगद्यातील गळती काढण्याचे काम नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे कोयनेच्या पाण्यावर अवलंबून राहणारे चिपळूण शहर, एमआयडीसी आणि ग्रॅव्हिटीची पाणी योजना राबवणाऱ्या गावांवर तीन महिने पाणीबाणी येणार आहे. कोयनेच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्यांना ऐन दिवाळीत पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
कोयना धरणातील पाणी बोगद्याद्वारे टप्पा एक आणि दोनमध्ये आणले जाते. तेथे वीज निर्मिती केल्यानंतर हे पाणी चौथ्या टप्याकडे नेले जाते. चौथ्या टप्यात वीज निर्मिती झाल्यानंतर हे पाणी कोळकेवाडी धरणात सोडले जाते. कोळकेवाडी धरणाच्या खाली तिसरा टप्पा आहे. तेथे वीज निर्मिती केल्यानंतर कोयनेचे पाणी कालव्याद्वारे वाशिष्ठी नदीला सोडले जाते. या पाण्यापैकी १३ लाख लिटर पाणी दररोज चिपळूण पालिका उचलते. खेर्डी एमआयडीसीसाठी ८ मिलियन लिटर आणि लोटे एमआयडीसीसाठी २५ मिलियन लिटर पाणी एमआयडीसी उचलते. वाशिष्ठी नदीच्या पाण्यावर पोफळीपासून चिपळूणपर्यंत अनेक गावच्या पाणी योजना अवलंबून आहेत. अनेक गावांना पोफळी आणि कोळकेवाडी येथील ईव्हीटीतून ग्रॅव्हिटीने पाणी देण्यात आला आहे.
कोयना धरणातून टप्पा १ आणि २ कडे येणाऱ्या बोगद्याला गळती लागली आहे. गळती काढण्याचे काम करताना प्रकल्पातून होणारी वीज निर्निती बंद करण्यात आली तर कोयनेचे पाणी वाशिष्ठी नदीला येणार नाही. परिणामी कोयनेच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ज्यांना कोयनेचे पाणी ग्रॅव्हिटीने देण्यात आले आहे. अशा गावांना जलसंपदा विभागाकडून नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुरूस्तीच्या कामाची पत्राद्वारे पूर्वकल्पना देण्यात आली आहे. पर्यायी व्यवस्था करण्याची सूचनाही त्या ग्रामपंचायतींना जलसंपदा विभागाने केली आहे. मात्र जे वाशिष्ठी नदीतून पाणी उचलतात त्यांना जलसंपदा विभागाचे पत्र गेलेले नाही. त्यामुळे संपर्ण प्रकल्प बंद राहिला तर ऐन दिवाळीत पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

कोट
संपूर्ण कोयना प्रकल्प बंद न ठेवता केवळ टप्पा एक आणि दोनकडे जाणारे पाणी बंद करून दुरुस्तीचे काम करता यावे. तसेच टप्पा तीन आणि ४ मधून वीज निर्मिती सुरळीत करता यावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून महानिर्मितीचे फार मोठे नुकसान होणार नाही. वाशिष्ठी नदीला पाणी खेळते राहील. पण ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनांची अडचण होणार आहे. त्यावर पर्याय काढण्याचे काम सुरू आहे.
--संजय डोईफोडे, अधीक्षक अभियंता, कोयना जलसिंचन विभाग


कोट
कोयनेच्या बोगद्यातील दुरुस्तीचे काम नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रॅव्हिटीची पाणी योजने असलेल्या गावांना तीन महिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना जलसंपदा विभागाकडून पत्राद्वारे करण्यात आली आहे.
-अनिल शिंदे, ग्रामसेवक, पोफळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com