किर्लोसमध्ये गव्यांचा उपद्रव

किर्लोसमध्ये गव्यांचा उपद्रव

07038
किर्लोस ः भावेवाडी येथे गव्यांनी काजू बागायतीचे केलेले नुकसान.

किर्लोसमध्ये गव्यांचा उपद्रव

बागायतींची हानी; वनविभाग सुशेगाद, शेतकरी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ ः किर्लोस (ता. मालवण) भागातील शेतकरी गव्यांनी घातलेल्या धुमाकूळामुळे हैराण झाले आहेत. हे गवे काजू कलमांसह अन्य शेतीही उद्‍ध्वस्त करीत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. एकीकडे ‘शेतीकडे वळा’, असा संदेश दिला जात असतानाच वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचविण्यासाठी उपाययोजना आखल्या जात नसल्याने शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वन विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
किर्लोससह गोठणे, असगणी भागातही गव्यांनी उच्छाद मांडला आहे. अनेकदा भरवस्तीतही गव्यांचे दर्शन होत असल्याने शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. किर्लोस गावातील चव्हाणवाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर, तर तब्बल सात ते आठ गव्यांचा कळप बिनदिक्कतपणे फिरत असल्याचे अनेकांच्या दृष्टिपथास आले. त्यामुळे दिवस अथवा रात्रीही या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. अद्याप या गव्यांनी मानवहानी केली नसली तरी शेती-बागायतीचे प्रचंड नुकसान केले आहे.
---
वनविभागाने लक्ष द्यावे
नुकतेच किर्लोस-भावेवाडीतील येथील वसंत भावे यांच्या काजू बागायतीचे गव्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. जंगलमय भागात पाण्याचे साठे नसल्याने ते पाण्यासाठी गडनदीचा आसरा घेत असून, सायंकाळी अथवा रात्री भर रस्त्यावर कळपाने येतात. त्यामुळे अपघाताची भीती आहे. वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचविण्यासाठी उपाययोजना आखल्या जात नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. वनविभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com