वाशिष्ठीच्या गाळाची चर्चा प्रदुषणाकडे दुलर्क्ष

वाशिष्ठीच्या गाळाची चर्चा प्रदुषणाकडे दुलर्क्ष

जागतिक पर्यावरण दिन विशेष ...........लोगो

rat४p३६.jpg -KOP२३M०७०५४
चिपळूण ः वाशिष्ठी नदीत फरशीतिठा येथील पुलाच्या खाली असा कचरा साठतो. (मुझफ्फर खान सकाळ छायाचित्रसेवा)

वाशिष्ठीतीतील गाळाची चर्चा, नदीच्या प्रदुषणाकडे दुर्लक्ष

नदी वाचविण्यासाठी उपाययोजनेबाबातबोलघेवडे अधिक ; सामुहिक प्रयत्नांची गरज
चिपळूण, ता. ४ ः वाशिष्ठी नदी गाळाबरोबरच प्रदुषणाच्या विळख्यात अडकली आहे. नदीतील गाळ काढण्याबाबत सर्वत्र चर्चा होते. मात्र प्रदुषणाचा विषय कुठेही चर्चेला येत नाही. सोशल मीडियावर चर्चा करणारे प्रत्यक्षात नदी प्रदुषणाबाबत गंभीर नसल्याचे दिसते. नदीचे पर्यावरण राखण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज आहे.
अमर्याद घनकचरा, प्लास्टिक, जनावरे व कपडे धुणाऱ्यांची वाढती संख्या, आदींमुळे वाशिष्ठी नदीपात्र प्रदुषित होत आहे. चिकन, मटणच्या दुकानातून निघणारा कचरा वाशिष्ठी नदीत टाकला जात आहे. पोफळीपासून चिपळूण शहरातील घरगुती सांडपाणी कोणतेही प्रक्रिया न करता वाशिष्ठी नदीत सोडले जात आहे.
खेर्डीतील अनेक कारखान्यांचे पाणी थेट वाशिष्ठी नदीत सोडले जाते. लोटे येथील काही कारखानदार पाणी टॅंकरने आणून रात्री बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीत सोडतात हा सर्वात प्रकार गेली कित्येक वर्ष सुरू आहे.नदी संवर्धनाचा संदेश देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मध्यंतरी वाशिष्ठी नदीचे जलपुजन केले. मोठा गाजावाजा करून हा कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर मात्र मुख्य प्रश्नाकडे पाठ फिरवण्यात आली.
महापूरानंतर वाशिष्ठी नदीच्या स्वच्छता आणि सुशोभीकरणाबाबत लोकप्रतिनिधींनी अनेक घोषणा केल्या मात्र त्या अमलात येण्यासाठी कालावधी लागेल. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पेठमाप, फरशीतिठा, बहादूरशेख नाका, गोवळकोट, गांधारेश्वर या भागात नदीतील कचरा काठावर दिसत आहे. त्याची उचल करून साफसफाई त्वरित करणे गरजेचे आहे.

--------------

चौकट
नेमकं होतय काय
*अमर्याद घनकचरा, प्लास्टिक नदीत
*कपडे धुणाऱ्यांची वाढती संख्या
*चिकन, मटण दुकानांचा कचरा पात्रात
*घरगुती सांडपाणी प्रक्रियेविना नदीतच
*कारखान्यांचे पाणी टॅंकरने रात्री ओततात

---
पोहणाऱ्यांची संख्याही रोडावली
नदीत पोहण्यासाठी काही ठिकाणी डोह आहेत. त्याठिकाणी वाहून येणाऱ्या काचा पोहणाऱ्यांना इजा पोहोचवत आहेत. त्यामुळे नियमित पोहणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे. चिपळूण शहर हगणदारीमुक्त झाले असले तरी शौचालयांचे पाणी थेट नदीत सोडले जाते. अनेकांना पोहल्यानंतर अंगाला खाज सुटणे, डोळे लाल होणे, दात आंबणे आदींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यंदाच्या मे महिन्याच्या सुटीत अनेक नवशिक्या जलतरणपटूंना नदीत डुंबण्याचा आनंद लुटता आला नाही. पेठमाप भागात अनेक जण आपली दुचाकी व चारचाकी वाहने धुण्यासाठी नदीत घेवून जातात. तेथे पायात काचा घुसून इजा होण्याचे प्रकार घडत आहेत.


कोट

नदी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे माशांच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. नदीतील मासे, पक्षी, खारफुटी आदी जैवविविधतेचे दर्शन घडावे यासाठी नदी दूषित होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. जलचरांना मोकळा श्‍वास घेण्यासाठी निळीशार गरजेचा गरजेची आहे. निसर्गाचे नियम पाळल्यास ही किमया आपणच करू शकतो.
- शाहनवाज शाह, पर्यावरण अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com