क्राईम

क्राईम

रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी ः रत्नागिरी ते मुंबई जाणाऱ्‍या रेल्वे मार्गावर अज्ञात तरुणाचा छिन्न-विछिन्न अवस्थेत मृतदेह मिळून आला. ही घटना शनिवारी (ता. ३) सकाळी ५.५० वाजता उघडकीस आली. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत स्टेशन मास्तर अमर मुकादम यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. शनिवारी सकाळी स्टेशन मास्तर मुकादम ट्रॅकची पाहणी करताना मेन लाईनच्या डाव्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्याच्या कंबरेच्या खाली दोन्ही पाय कट होउन पाय व धड वेगवेगळे झाले होते. तसेच उजवा हात पंज्याच्या वरील बाजूस तुटलेला होता. रेल्वेची धडक बसून तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.
-------------------------

घाटिवळे अपघातातील प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी ः घाटीवळे फाटा येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रौढाचा उपचारावेळी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. विलास गोविंद जाधव (५२, रा. घाटिवळे संगमेश्वर, रत्नागिरी) असे त्या मृत पावलेल्या प्रौढाचे नाव आहे. २१ मे रोजी रात्री ९.३० वाजता विलास जाधव यांचा घाटिवळे फाटा येथे अपघात झाला होता. अपघातात जखमी झाल्याने त्यांना प्रथम जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर खासगी हॉस्पिटल येथे दाखल करुन अधिक उपचारांसाठी २२ मे रोजी मध्यरात्री ३.१५ वाजता कोल्हापूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. २३ मे रोजी अधिक उपचारासाठी सीपीआर येथे दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकिय अधिकाऱ्‍यांनी विलास जाधव यांना तपासून मृत घोषित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com