एसटी प्रवाशांसाठी आमदार साळवी धावले आगारात

एसटी प्रवाशांसाठी आमदार साळवी धावले आगारात

एसटी प्रवाशांसाठी आमदार धावले आगारात
मुंबईकडे जाणारी बस खराब; अखेर सोडली नवी गाडी
रत्नागिरी, ता. ७ः रत्नागिरीतून मुंबईकडे जाणारी एसटी बस व्यवस्थित नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी गाडी बदलण्याची मागणी केली; मात्र एसटीच्या अधिकाऱ्यांनी नकारघंटा वाजवली. हा विषय शिवसेनेचे शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे यांनी आमदार डॉ. राजन साळवींपुढे मांडला. त्यांनी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आगारप्रमुखांकडे धाव घेत प्रश्‍न मार्गी लावला.
प्रवाशांची एसटीला पसंती असतानाही रत्नागिरी एसटी विभागाने मंगळवारी (ता. ६) रत्नागिरीहून बोरिवलीकडे सोडण्यात आलेली बस दूरवरच्या प्रवासासाठी अयोग्य होती. त्या बसमध्ये ना बसायला चांगली आसने, ना खिडक्या, ना गाडीला पिकअप्. या गाडीतील प्रवाशांनी जोपर्यंत सुस्थितीत आणि चांगल्या दर्जाची बस प्रवासासाठी उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत या गाडीतून आम्ही प्रवास करणार नाही, असा पवित्रा घेतला. गाडीची परिस्थिती लक्षात आल्यानंतर सर्वच प्रवाशांनी जोर धरला. त्यामुळे बराच वेळ गाडी एकाच ठिकाणी उभी होती. गाडीचे चालक आणि वाहक यांनी बस आगारप्रमुखांशी चर्चा करून प्रवाशांची मागणी मांडली; मात्र अधिकार्‍यांनीही नकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे बस तिथे होती.
या गाडीतून प्रवास करणार्‍या साक्षी पेडणेकर यांनी हा प्रकार शिवसेनेचे गणपतीपुळे शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे यांना दूरध्वनीवरून सांगितला. सुर्वे यांनी तत्काळ लोकांच्या गैरसोयीची दखल घेत आमदार डॉ. राजन साळवी यांचे स्वीय सहाय्यक सुभाष मालप यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली. आमदार साळवी यांच्यापर्यंत हा विषय पोचल्यानंतर त्यांनीही तत्काळ प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी रत्नागिरी आगारात धाव घेतली. सर्व बाबी प्रत्यक्षात समजून घेतल्यानंतर एसटी प्रशासनाच्या गलथानपणाचा खरपूस समाचारही घेतला. रत्नागिरी-मुंबई प्रवासासाठी नवी गाडी देण्याची सूचना केली. आगार व्यवस्थापक यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने कारणांची यादी तयार केली; मात्र आमदार साळवींनी आपली मागणी लावून धरत नवी गाडी मार्गस्थ झाल्यानंतरच तिथून बाहेर पडले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोयीतून मुक्तता झाली.

कोट
आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा फोन आल्यानंतर त्याची गांभीर्याने दखल घेऊन आमदार साळवी यांनी कार्यकर्त्यांबाबत असलेली आपुलकी आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच लोकप्रतिनिधी आहेत, हे दाखवून दिले. अत्यंत कमी वेळेत सर्वसामान्य प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष न करता ती सोडवण्याला त्यांनी प्राधान्य दिले.
- कल्पेश सुर्वे, शिवसेना शाखाप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com