शेतकऱ्यांना सरकारने नुकसानभरपाई द्यावी

शेतकऱ्यांना सरकारने नुकसानभरपाई द्यावी

Published on

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या
लियाकत शहा ः तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ : दिवाळीत पडलेल्या पावसामुळे चिपळूण तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना दिले.
यावर्षी पावसाचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक असून, सततच्या पावसामुळे शेतीत पाणी साचणे, ओलावा टिकून राहणे व परतीच्या पावसामुळे काढणीस आलेली भातशेती आडवी पडून नष्ट झाली आहे. त्यामुळे मेहनत, वेळ व पैसा वाया गेला आहे तसेच आर्थिक संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने पाऊल उचलून तातडीने मदत करावी. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत. चिपळूण तालुक्यातील शेतकरी कुटुंब चालवण्यासाठी शेती करतात. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे, याची जाण ठेवून पंचनामे करावेत. जी भातशेती आडवी झाली आहे त्याचेही पंचनामे करावे, असे शहा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com