
मासेमारी हंगामासंदर्भात मच्छीमारांमध्ये संभ्रम
मासेमारी हंगामाबाबत संभ्रम
मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाने दिलेल्या निर्देशानुसार १ ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरू होत आहे; परंतु मच्छीमारांच्या विविध राज्यांतील संघटनांनी मासेमारी हंगाम सुरू करण्याच्या कालावधीसंदर्भात वेगवेगळी मागणी केली आहे. यामुळे मासेमारीचा कालावधी १ ऑगस्टला सुरू होणार की १५ ऑगस्टला याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याप्रकरणी राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. केंद्र सरकारने नेमलेल्या डॉ. अय्यपन समितीच्या शिफारसीनुसार पश्चिम क्षेत्रातील राज्यासाठी (गुजरात व महाराष्ट्र) मासेमारी करण्याचा हंगाम १ ऑगस्ट ते ३१ मे व गोवा कर्नाटक, तामिळनाडू यासह पश्चिम बंगाल या राज्यांसाठी १६ एप्रिल ते १६ जून असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत बदल करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारकडे आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90455 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..