रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून रिफायनरीवरून अनेक वाद-विवाद सुरु आहेत.रिफायनरी होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी आधीच विरोध केला आहे.राजापूरात रिफायनरी विरोधक राजकिय मैदानातून धक्का देण्याच्या तयारीत आहेत. रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या नेत्यांना गावात प्रवेश द्यायचा नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे कोकणात शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान, रिफायनरीबाबत महाराष्ट्र शासनाची भूमिका केंद्र सरकारला कळवली असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केंद्राला कळवलंय. बारसूमध्ये (Barsu) रिफायनरी करायची कि नाही हे केंद्र सरकार ठरवणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले.
राजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कायम शिवसेनेसोबत एकनिष्ठ असल्याचा राजापूरचा इतिहास आहे. या भागात रिफायनरीला विरोध करत आक्रमक झालेले जवळपास १२ ते १३ हजार मतदार आहेत. तर १० ते १२ ग्रामपंचायती, २ पंचायत समिती आणि १ जिल्हा परिषदेची जागा यावर याचा परिणाम होऊ शकतो. दरम्यान रिफायनरी विरोधकांनी आगामी निवडणुकांत रिफायनरी विरोधी पॅनल उभं करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. कोकणातील ही नाराजी शिवसेनेला जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धोपेश्वर-बारसू भागात रिफायनरी प्रकल्पासाठी राज्य शासन अनुकूल असल्याचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जानेवारीतच दिले होते. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे पूर्वीपासूनच रिफायनरीला समर्थन आहे. त्यामुळे राजापुरात ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया रिफायनरी प्रकल्प समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर यांनी व्यक्त केली होती. . मात्र येथील गावकऱ्यांचा याला विरोध आहे. याठिकाणी प्रदूषण वाढून कोकणच्या सौंदर्याला धक्का पोहचू शकते अशी गावकऱ्यांची भूमिका आहे. मात्र न्यायालय याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.