रत्नागिरीत पावसाची ओढ; तीनपर्यंत ४७ टक्के मतदान

रत्नागिरी- पाली येथील मतदान केंद्रात आमदार सामंतांनीही रांगेत उभे राहुनच मतदान केले.
रत्नागिरी- पाली येथील मतदान केंद्रात आमदार सामंतांनीही रांगेत उभे राहुनच मतदान केले.

रत्नागिरी - जिल्ह्यात पाचही मतदारसंघात तीन वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान झाले होते. पावसाने ओढ दिल्याने सकाळच्या टप्प्यात मतदानास जोर आला. मतदार संघ निहाय आकडेवारी अशी - रत्नागिरी - ४५.६२ टक्के, चिपळूण - ५१.९३ टक्के, गुहागर -  ४७.१७ टक्के, दापोली - ५२.९६ टक्के, राजापूर - ४३.४६ टक्के. 

दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळच्या टप्प्यात उत्साही वातावरणात मतदान होईल, अशी अपेक्षा होती. पावसानेही मेहेरबानी केली. त्यामुळे सकाळी पहिल्या सत्रात सुरवात चांगले झाली. मात्र त्यानंतर दुपारी एक पर्यंतची आकडेवारी पाहता अतिशय संथगतीने मतदान झाले. दुपारपर्यंत 39 टक्केच मतदान झाले होते. शहरासह तालुक्यात मतदार अनुत्सुक दिसत होते. सायंकाळ होण्यापूर्वी पावसाने हजेरी लावल्याने उमेदवारांच्या पोटात गोळा उठला होता. पावसाळी वातावरणामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची भिती ग्रामीण भागात आहे.

कालपासून सुरू असेलल्या पावसाचा मतदानावर मोठा परिणाम होईल, अशीच स्थिती होती. परंतु सकाळपासून वातावरणात बदल झाला. स्वच्छ आणि सूर्यप्रकाशामुळे मोकळे वातावरण असल्याने उत्साही वातावरणात मतदानाला सुरवात झाली. सकाळी पहिल्या टप्प्यात मतदानाची चांगली सुरवात झाली. सात ते नऊ या दरम्यान तालुक्यात 8.88 टक्के मतदान झाले.

ग्रामीण भागात देखील प्रतिसाद मिळाला. भात कापणीची कामे सुरू असल्याने ग्रामीण भागात सकाळी 10 ते 11 पर्यंत 25.04 टक्के चांगले मतदान झाले. परंतु पावसामुळे शेतीच्या कामांचा खोळंबा झाला. मतदानासाठी ग्रामीण मतदाराला संधी मिळाली. शहर आणि परिसरताही तिच परिस्थिती होती. मात्र अकरा नंतर हे वातावरण बदलले सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत अतिशय संथप्रतिसाद मिळाला. मतदारांमध्ये उत्साह दिसत नव्हता. 39 टक्के एवढेच मतदान झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

जिल्हा प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मतदारांमध्ये चांगलीच जनजागृती केली आहे. सखी मतदान केंद्र आणि आदर्श मतदान केंद्र उभारून महिला मतदारांचा टक्का वाढविण्याच प्रयत्न केला. परंतु शहर आणि ग्रामीण भागामध्ये केंद्रांवर मतदारांच्या रांगा शोधुन मिळत नव्हत्या. एवढा धिमा प्रतिसाद होता.

दिव्यांग मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाने चांगली व्यवस्था केली होती. व्हिल चेअर, रॅम्प आदीची व्यवस्था केंद्रावर होती. त्यांना मदत करण्यासाठी कर्मचारीही नियुक्त केले होते. मतदानासाठी किमान सायंकाळी मतदार बाहेर पडतील, असे दिसत होते. परंतु दुपारनंतर मतदानावर पावसाचे सावट होते. कोकणनगर, राजिवडा, मिरकरवाडा आदी जोखिमीच्या मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.  

रत्नागिरी  विधानसभा मतदरासंघ  

  • एकुण मतदार 2 लाख 81 हजार 587,
  • महिला 1 लाख 44 हजार 085,
  • पुरुष 1 लाख 37 हजार 493
  • एकूण मतदान केंद्र 346

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com