वाऱ्या‍मुळे मासेमारीचा मुहूर्त हुकणार; मच्छीमारांमध्ये संभ्रम

वातावरण बिघडले, मिरकरवाडा बंदरात हालचाली
वाऱ्या‍मुळे मासेमारीचा मुहूर्त हुकणार; मच्छीमारांमध्ये संभ्रम

रत्नागिरी : शासनाच्या निर्देशाप्रमाणे मासेमारी बंदी कालावधी एक ऑगस्टपासून संपत असल्यामुळे पर्ससिननेट वगळता अन्य मच्छीमारी (fisherman) नौकांद्वारे मासेमारीला सुरवात होणार आहे; परंतु सध्या किनारी भागात हलका वारा असल्यामुळे मासेमारी सुरू करण्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. या परिस्थितीत धोका पत्करून काही ट्रॉलर्सद्वारे मासेमारीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. मिरकरवाडा बंदरामध्ये (mirakwada ports) काही मच्छीमारांनी हालचालीही सुरू केल्या आहेत.

कोविडची (covid-19) परिस्थिती आणि बिघडलेले वातावरण यामुळे मागील दोन हंगामात मच्छीमारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. गतवर्षी पावसाळा लांबल्यामुळे समुद्रही खवळलेलाच होता. डिसेंबर महिन्यात बर्‍यापैकी वातावरण निवळले; मात्र मे महिन्याच्या शेवटी तौक्ते वादळाने दणका दिला. मार्च ते मे या काळात कोरोनातील बंदीचा फटका मच्छीमारीला बसला होता. कोरोना निर्बंधांमुळे मच्छीमारांना कारभार हाकता आलेला नव्हता. परराज्यातून येणाऱ्या खलाशांची उपलब्धता, व्यवसायासाठी आर्थिक चणचण, डिझेल परतावा रखडल्यामुळे मागील हंगामात मच्छीमार अडचणीत सापडले होते. अजूनही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. त्यावर मात करत मच्छीमार समुद्रावर स्वार होण्यासाठी सरसावणार आहेत.

वाऱ्या‍मुळे मासेमारीचा मुहूर्त हुकणार; मच्छीमारांमध्ये संभ्रम
ठाकरे सरकारकडून अजूनही पूरग्रस्तांना मदत नाही: देवेंद्र फडणवीस

शासनाने एक जून ते ३१ जुलै हा कालावधी मासेमारी बंदीसाठी निश्‍चित केला आहे. त्यानुसार एक ऑगस्टपासून मासेमारीला सुरवात करता येईल. यामध्ये ट्रॉलर, गिलनेट, डोलनेट व इतर लहान-मोठ्या बोटींद्वारे मासेमारी करण्यास परवानगी आहे. पर्ससिननेटला एक सप्टेंबर ते ३१ डिसेंबर हा कालावधी देण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वी वादळी वार्‍यांसह अति मुसळधार पाऊस झाला होता. वेगवान वाऱ्यामुळे समुद्रही खवळलेला आहे.

वातावरण स्थिरावू लागले असले तरीही अजून किनारी भागात वारे आहेत. पाण्यालाही करंट असल्याने छोट्या नौका समुद्रात नेणे धोकादायक ठरु शकते. वातावरणाचा अंदाज नसल्यामुळे अनेक मच्छीमारांनी अजूनही मासेमारीला जाण्यासाठी तयारी केलेली नाही. त्यामुळे बंदी उठल्यानंतर दोन-पाच टक्केच नौका मासेमारीसाठी जातील, असा अंदाज वर्तविला जात आहे. यामध्ये काही ट्रॉलर्सचा समावेश असेल.

खलाशी आणण्याचे आव्हानच

कोरोनामुळे परराज्यातील खलाशांना मासेमारीसाठी आणण्याचे आव्हान मच्छीमारांपुढे आहे. कर्नाटक, नेपाळ, केरळ येथून अनेक खलाशी येतात. कोरोनामुळे येथे येण्यासाठी त्यांना अजून पंधरा दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतर कोरोना निकषांचे पालन करून त्यांच्या चाचण्या केल्या जातील. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावरच मासेमारीला खर्‍या अर्थाने आरंभ होणार आहे.

वाऱ्या‍मुळे मासेमारीचा मुहूर्त हुकणार; मच्छीमारांमध्ये संभ्रम
Photo: CM उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात आमनेसामने

"किनारी भागात अजूनही वेगवान वारे वाहत आहेत. वातावरण बिघडल्यामुळे 1 तारखेपासून समुद्रात नौका नेणे अशक्य आहे."

- अभय लाकडे, मच्छीमार, गिलनेटधारक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com