मुंबई : विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईची लढत आज छत्तीसगडविरुद्ध होईल. अलूर येथे होणाऱ्या या सामन्यात झारखंडविरुद्ध आक्रमक द्विशतक केलेल्या यशस्वी जैसवालकडे सर्वांचे लक्ष असेल.
मुंबई संघात भारतीय संघातून मर्यादित षटकांच्या लढतीत चमक दाखवत असलेला श्रेयस अय्यर आहे. त्याचबरोबर आदित्य तरे, शिवम दुबे हे बहरात असलेले फलंदाज आहेत, तरीही लक्ष्य यशस्वीकडे जास्त असेल. त्याने झारखंडविरुद्ध द्विशतक केले होते. तो आपला धावांचा ओघ कायम राखणार का हा चर्चेचा मुद्दा आहे. मुंबई वीर प्रताप सिंग आणि शशांक सिंगच्या गोलंदाजीचा कसा सामना करणार यावर सर्व काही अवलंबून असेल.
स्पर्धेच्या साखळी लढतीत छत्तीसगडने तीनशेहून जास्त धावांचे लक्ष्य साधल होते. आता त्यामुळे शार्दुल ठाकूर, धवल कुलकर्णी आणि शम्स मुलानी यांच्यावर अमनदीप खरे, आशुतोश सिंग तसेच त्यांच्या सहकारी फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी असेल.
|