विराट-रोहितमधील वादावर बीसीसीआयचे मोठे विधान

विराट-रोहितमधील वादावर बीसीसीआयचे मोठे विधान

नवी दिल्ली : विश्वकरंडकाच्या उपांत्यफेरीत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाच विराट कोहली आणि रोहित शर्मा असे दोन गट पडल्याची चर्चा होती. तसचे प्रशिक्षक रवी शास्त्रींना हटविण्याची मागणीही खेळाडू करत असल्याची चर्चा होता. मात्र, आता संघ व्यवस्थापनाने यावर मोठे स्पष्टीकरण दिले असून कोहली आणि रोहित यांच्यातील वाद ही निव्वळ अफवा असल्याचा खुलासा केला आहे. 

''ही पूर्णपणे अफवा आहे आणि अशा अफवांनी भारतीय संघात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ल्ड कप संपला आहे आणि आता लोकांना नव्या हेडलैाईन हव्या आहेत बाकी काही नाही. स्वत:च्या फायद्यासाठी लोकं काहीही अफवा पसरवतात याचे वाईट वाटते,'' असे मत संघ व्यवस्थापनातील सदस्याने व्यक्त केले. 

शिखर धवन आणि विजय शंकर यांच्या दुखापतीबद्दल माहिती देताना ते म्हणाले, ''शिखर धवन आणि विजय शंकर यांच्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. निवड समिती प्रमुख त्यावर निर्णय घेतील.''  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com