INDvsSA : 9 कोटींसाठी BCCIने सोडली टीम इंडियाची सुरक्षा वाऱ्यावर

Chandigarh Police will not provide security to team India
Chandigarh Police will not provide security to team India

मोहाली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेतील दुसरा सामना आज चंदीगडमधील मोहालीतील स्टेडियमवर होणार आहे. यासाठी भारतीय संघ एक दिवस आधीच मोहालीमध्ये पोहोचला आहे. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला चंदीगड पोलिसांकडून कोणतीही सुरक्षा मिळणार नाही आहे आणि जबाबदार बीसीसीआय आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 सप्टेंबर रोजी धर्मशाला येथे आयोजित करण्यात आलेला सामना पावसामुळं रद्द झाला. दरम्यान सोमवारी 16 सप्टेंबरला चंदीगड विमानतळावर भारतीय संघ पोहचला, मात्र त्यावेळी भारतीय संघाला कोणतीही सुरक्षा देण्यात आली नव्हती.

बीसीसीआयच्या एका चुकीमुळे भारतीय संघाच्या सुरक्षा धोक्यात आली आहे. चंदीगड पोलिसांनी टीम इंडियाला सुरक्षा देण्यास नकार दिल्यावर मोहाली पोलिसांना विमानातळावर जाऊन संघाता सुरक्षा द्यावी लागली. बीसीसीआयने चंदीगड पोलिसांचे नऊ कोटी रुपये थकविल्याने टीम इंडियाला कोणतीही सुरक्षा देण्यात आली नाही. टीम इंडियासोबतच दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही कोणतीही सुरक्षा देण्यात आली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com