IND vs AUS Test Series Pitch : भारत - ऑस्ट्रेलिया पहिल्या दोन कसोटीतील खेळपट्ट्यांना आयसीसीनं दिलं रेटिंग

IND vs AUS Test Series Pitch
IND vs AUS Test Series Pitchesakal

IND vs AUS Test Series Pitch : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव झाला. विशेष म्हणजे या दोन्ही कसोटी अडीच दिवसात संपुष्टात आल्या. पहिल्या कसोटीत तर ऑस्ट्रेलियाचा एक डावाने पराभव झाला. यानंतर नागपूर आणि दिल्ली दोन्ही खेळपट्ट्यांबाबत बरेच काही बोलले जाऊ लागले. दरम्यान, आयसीसीने या दोन्ही कसोटीतील खेळपट्ट्यांबाबत आपले रेटिंग प्रसिद्ध केले आहे.

IND vs AUS Test Series Pitch
ISSF World Cup : अनिश भानवालाने 12 वर्षाचा दुष्काळ संपवला; भारताला जिंकून दिले पदक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नागपूर आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणांच्या खेळपट्ट्यांबाबत निर्णय दिला आहे. ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट्सनुसार आयसीसीने दोन्ही ठिकाणच्या खेळपट्ट्यांना 'साधारण' (Average) रेटिंग दिले आहे. साधारण रेटिंग म्हणजे खेळपट्टी परिपूर्ण नसलेली परंतु एक सभ्य खेळपट्टी. मात्र, आयसीसीने खेळपट्टीबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

सिडनी हेराल्ड आणि द एज या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मालिकेपूर्वीच खेळपट्ट्यांवर बरीच चर्चा झाली होती. आणि आता नागपूर आणि दिल्लीच्या खेळपट्ट्यांना झिम्बाब्वेचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी ‘साधारण’ म्हटले आहे. वृत्तपत्राने लिहिले की, पहिल्या दोन दिवशी भारताला बॅकफूटवर पाठवल्यानंतर पायक्रॉफ्टने तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडल्यानंतर दिल्लीच्या खेळपट्टीचेही साधारण वर्णन केले आहे.

IND vs AUS Test Series Pitch
Gautam Gambhir KL Rahul : IPL मधील गट्टी! सडेतोड गौतम गंभीरची रोहितचे उदारहण देत राहुलसाठी जोरदार बॅटिंग

नागपुरात तीन दिवसांत सामना गमावल्यापासून कांगारू माजी क्रिकेटपटू आणि प्रसारमाध्यमांनी सतत खेळपट्टीचा मुद्दा बनवला आहे. त्यांच्या मते, दोन्ही ठिकाणच्या खेळपट्ट्या स्पोर्टिंग नव्हत्या. तथापि, टीकेचा आधार पूर्णपणे अनाकलनीय आहे कारण ही तीच खेळपट्टी आहे ज्यावर भारताचे खालच्या फळीतील फलंदाज रवींद्र जडेजा आणि टेलेंडर रविचंद्रन अश्विन यांनी अनुभवी कांगारू फलंदाजांपेक्षा चांगली कामगिरी केली. अशा परिस्थितीत सामनाधिकार्‍यांनी खेळपट्टीचे ‘साधारण’ असे केलेले वर्णन खूपच आश्चर्यकारक आहे.

नागपुरात कांगारू 177 आणि 91 धावा केल्या, त्यानंतर भारताने त्यांच्या एकाच डावात 400 धावा केल्या आणि त्यांना दुसऱ्या डावाची गरज नव्हती. ऑस्ट्रेलियाने दिल्ली कसोटीत पहिल्या डावात चांगली कामगिरी केली, परंतु तिसऱ्या दिवशी त्यांची फलंदाजी अशी घसरली की त्यांच्या माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्या फलंदाजांना चांगलेच धारेवर धरले, ही टीका अजूनही सुरू आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : जाणून घ्या कॉन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com