इंदूर : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आज इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये सुरवात झाली. या सामन्यात भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांनी बांगला वाघांना सुरवातीलाच दणके दिले आहेत.
बांगलादेशने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने नाणफेक गमावली तरी कर्णधार विराट कोहली खूप खूश होता कारण खेळपट्टीवर गवत दिसत होते आणि इतिहास पाहिला तर इंदूरमध्ये पहिल्या दिवशी गोलंदाजीलाच मदत मिळाली आहे.
कोहलीचा अंदाज खरा ठरला आणि भारतीय गोलंदाजांनी सुरवतीलाच बांगलादेशला दोम दणके दिले. उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांनी त्यांचे दोन्ही सलामीवीर बाद केले. सहाव्या षटकात उमेशने इमरुल कायेसला सहा धावांवर बाद केले. थर्ड स्लिपमध्ये उभा असलेल्या अजिंक्य रहाणेने त्याचा सहज झेल घेत त्याला माघारी धाडले.
त्यानंतर पुढच्याच षटकात म्हणजे सातव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ईशांत शर्माने शादमान इस्लामला सहा धावांवर बाद केले. त्याने टाकलेला बॉल बरोबर स्विंग झाला आणि वृद्धिमान साहाने झेल घेण्यात कोणतीच चूक केली नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.