Cricket : लग्नामुळे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळू शकणार नाही ; ऋतुराज गायकवाड

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात दोन हात करणार आहे.

 ऋतुराज गायकवाड
ऋतुराज गायकवाडsakal

नवी दिल्ली : ऋतुराज गायकवाडचे जूनच्या सुरुवातीला लग्न होत असल्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी राखीव खेळाडू म्हणून त्याच्याऐवजी मुंबईच्या यशस्वी जयस्वालची निवड करण्याच आली आहे.

यशस्वी जयस्वाला भारतीय संघ व्यवस्थापाने रेड बॉलने सराव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच त्याच्याकडे अगोदरच यूकेचा व्हिसा आहे, त्यामुळे लंडनला प्रयाण करण्यात त्याला अडचणी येणार नाहीत.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात दोन हात करणार आहे. हा सामना ७ जूनपासून लंडनमध्ये सुरू होत आहे.

लग्नामुळे आपण कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळू शकणार नाही, असे ऋतुराजने आम्हाला कळवले आहे. त्यामुळे आम्ही जयस्वालची निवड केली आहे. ऋतुराज ३-४ जून रोजी लग्नकार्यात व्यग्र असणार आहे .

आपण ५ जून रोजी लंडनला जाऊ शकतो असेही तो म्हणाला होता, परंतु मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी निवड समितीला ऋतुराजऐवजी बदली खेळाडू निवडण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही जयस्वालची निवड केली. तो लवकरच लंडनला रवाना होईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आलेले असल्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टिरक्षक इशान किशन रविवारी लंडनला रवाना झाले; तर सूर्यकुमार यादव ३० मे रोजी रवाना होत आहे.

शुभमन गिल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा हे रविवारी आयपीएल अंतिम सामना खेळत असल्यामुळे तेसुद्धा ३० मे रोजी लंडनला प्रयाण करतील असे सांगण्यात येत आहे. या सामन्यासाठी काही खेळाडू लंडनमध्ये दाखल झाले आहेत. यात विराट कोहलीचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com