MI vs RCB: रोहितची खेळी फसली! अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या Playing 11 मध्ये परतणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 arjun tendulkar comeback-in-mumbai indians

MI vs RCB: रोहितची खेळी फसली! अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या Playing 11 मध्ये परतणार

MI vs RCB Playing 11 : आयपीएल 2023 चा 54 वा सामना लीगच्या इतिहासातील दोन सर्वात मोठ्या आणि जुन्या संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आपल्या प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल करू शकतो. मुंबई इंडियन्सने गेल्या तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.

त्याचवेळी, मागील सामन्यात टीम चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 6 विकेट्सने पराभूत झाली आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघाच्या गोलंदाजीने आतापर्यंत धावांचा धडाका लावला आहे. प्रत्येक वेळी फलंदाज 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करू शकेल असा विचार तुम्ही करू शकत नाही.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या 42व्या सामन्यात रोहितने अर्जुन तेंडुलकरला बाहेर करून खेळी खेळली होती. मात्र, पंजाब किंग्जविरुद्धचे एक षटक 31 धावा वगळता अर्जुनची कामगिरी चांगली होती. मात्र रोहितने अर्शद खानला संधी दिली होती. अर्शदने त्या सामन्यात तीन विकेट घेतल्या आणि 39 धावा दिल्या. त्यानंतर पंजाब किंग्जविरुद्ध त्याने 4 षटकात 48 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतला. त्यानंतर CSK विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अर्शदने केवळ 1.4 षटकात 28 धावा दिल्या. म्हणजेच तिन्ही सामन्यांमध्ये त्याची सरासरी अतिशय खराब होती. यामुळेच आता रोहित शर्मा अर्जुन तेंडुलकरला परत संघामध्ये घेऊ शकतो.

अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर तो मुंबई इंडियन्सकडून चार सामने खेळला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पदार्पणाची संधी मिळाली. प्रत्येक सामन्यात सुरुवातीच्या षटकांमध्ये तो किफायतशीर होता. सनरायझर्स हैदराबादविरुद्धही त्याने शेवटच्या षटकात धावांचा बचाव करत संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर पंजाबविरुद्ध त्याने चांगली सुरुवात केली आणि प्रभसिमरन सिंगची विकेटही घेतली. यानंतर त्याने 16 वे षटक टाकले पण त्यात 31 धावा दिल्या.

त्यानंतर अर्जुन तेंडुलकरला खूप ट्रोलही करण्यात आले. गुजरातविरुद्ध रोहितने अजुन अर्जुनला संधी दिली. येथे त्याने शानदार पुनरागमन केले आणि सुरुवातीच्या षटकांमध्ये रिद्दिमन साहाची विकेटही घेतली. त्यानंतर रोहितने त्याला दोन षटके टाकल्यानंतर गोलंदाजी दिली नाही.

या सामन्यात त्याने फलंदाजीतही जौहरची चुणूक दाखवली. पण पुढच्या सामन्यातूनच तो वगळला गेला. अर्जुनने 4 सामन्यात 9.3 च्या इकॉनॉमीसह 3 विकेट घेतल्या आहेत. सुरुवातीच्या षटकांमध्येही तो खूपच किफायतशीर होता. अर्शदच्या बेदम मारहाणीनंतर रोहित पुन्हा ज्युनियर तेंडुलकरवर विश्वास दाखवणार की नाही हे पाहावं लागेल.