डब्लिंग : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात आयर्लंडच्या फलंदाजांनी भारताचे चांगलेच टेन्शन वाढवले. भारताने ठेवलेल्या 226 धावांच्या अवाढव्य आव्हानाचा पाठलाग करताना त्यांनी 20 षटकात 5 बाद 221 धावांपर्यंत मजल मारली. अखेर उमरान मलिकने शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 6 धावांची गरज असताना फक्त एक धाव देत सामना भारताच्या पारड्यात टाकला. आयर्लंडकडून कर्णधार बालबर्नेने सर्वाधिक 60 धावा केल्या.
भारताचे 226 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आयर्लंडलने दमदार सुरूवात केली. सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बिलबर्ने यांनी सहा षटकातच 72 धावा चोपल्या. स्टर्लिंगने तर 15 षटकात 40 धावा चोपल्या होत्या.
अखेर स्टर्लिंगचा 40 धावांवर रवी बिश्नोईने त्रिफळा उडवत भारताला दिलासा दिला. त्यानंतर आलेला ग्रेथ डेन्लीला हार्दिक पांड्याने शुन्यावर धावाबाद केले. मात्र त्यानंतर कर्णधार बिलबर्नेने आक्रमक फलंदाजी करत 9 व्या षटकात आयर्लंडचे शतक धावफलकावर लावले. अखेर हर्षल पटेलने 34 चेंडूत 60 धावा करणाऱ्या बिलबर्नेला बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले.
यानंतर उमरान मलिकने लॉरकेन टकरला 5 धावांवर बाद करत आपला पहिला आंतरराष्ट्रीय बळी मिळवला. मात्र दुसऱ्या बाजूने हॅरी टॅक्टर आणि डॉक्रेल यांनी पाचव्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरुवात केली. हॅरी टेक्टर आणि डॉक्रेल यांनी पाचव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी रचत भारताला टेन्शन दिले होते. मात्र भुवनेश्वरने टेक्टरला 39 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
दुसऱ्या बाजूने डॉक्रेल आणि मार्क एडियर यांनी सामना शेवटच्या षटकात 17 धावा असा आणला. हार्दिक पांड्याने शेवटचे षटक उमरान मलिक टाकण्यासाठी दिले. त्याने पहिला चेंडू निर्धाव टाकत आयर्लंडवर दबाव वाढवला. मात्र दुसरा चेंडू नो बॉल टाकला. त्यामुळे आयर्लंडला फ्री हिट मिळाली. एडियरने त्यावर चौकार मारत सामना 4 चेंडूत 12 धावा असा आणला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर एडिअरच्या बॅटची कडा घेऊन चेंडू सीमापार गेला. त्यामुळे सामना 3 चेंडूत 8 धावा आला. तिसऱ्या चेंडू उमरानने एक धाव दिली. दोन चेंडूत 7 धावांची गरज असताना मलिकच्या चेंडूवर पुन्हा धाव झाली. आता सामना 1 चेंडू आणि सहा धावा असा आला होता. उमरानने फक्त 1 धाव देत सामना 4 धावांनी जिंकून दिला.
तत्पूर्वी, भारताने आयर्लंडविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र इशान किशन अवघ्या 3 धावांची भर घालून परतला. मात्र त्यानंतर संधी मिळालेल्या संजू सॅमसन आणि दीपक हुड्डाने दुसऱ्या विकेटसाठी दमदार भागीदारी रचण्यास सुरूवात केली.
या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 176 धावांची विक्रमी भागीदारी रचली. संजू सॅमसनने 77 तर दीपक हुड्डाने 104 धावांची शतकी खेळी केली. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर आलेल्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. सूर्यकुमारने 5 चेंडूत 15 धावा केल्या तर हार्दिकने 13 धावांची भर घातली.
मात्र दिनेश कार्तिक, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल यांना भोपळाही फोडता आला नाही. आयर्लंडकडून मार्क एडिनने 3 तर जोशुआ लिटिल आणि क्रेग यंग यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
शेवटच्या षटकात सामना जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असताना उमरान मलिकने फक्त 12 धावा देत भारताला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला.
हॅरी टेक्टर आणि डॉक्रेल यांनी पाचव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी रचत भारताला टेन्शन दिले होते. मात्र भुवनेश्वरने टेक्टरला 39 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
उमरान मलिकने लॉरकेन टकरला 5 धावांवर बाद करत आपला पहिला आंतरराष्ट्रीय बळी मिळवला.
आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बिलबर्नेला 60 धावांवर बाद करत दुसरा सेट झालेला फलंदाज माघारी धाडला.
हार्दिक पांड्याने थेट फेकी करत ग्रेथ डेनलीला शुन्यावर धावबाद केले.
15 चेंडूत 40 धावा ठोकून पॉवर प्लेमध्येच आयर्लंडला सत्तरी पार करून देणाऱ्या स्टर्लिंगचा रवी बिश्नोईने त्रिफळा उडवला.
सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि अँड्रयू बालबिर्ने यांनी चार षटकात 50 धावांची सलामी दिली.
दीपक हुड्डाच्या 104 आणि संजू सॅमसनच्या 77 धावांच्या जोरावर भारताने आयर्लंडविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने 7 बाद 225 धावा ठोकल्या.
शतकवीर दीपक हुड्डा बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल दोघेही पाठोपाठ बाद झाले. त्यांना आपला 50 वा टी 20 सामना खेळणाऱ्या क्रेग यंगने बाद केले.
जोशुआ लिटिलने दीपक हुड्डाची 104 धावांची शतकी खेळी अखेर संपवली.
मार्क एडियरने संजू सॅमसनचा 77 धावांवर त्रिफळा उडवत दीपक हुड्डा आणि संजू सॅमसनची 176 धावांची भागीदारी तोडली.
दीपक हुड्डा पाठोपाठ सलामीवीर संजू सॅमसनने देखील अर्धशतक झळकावले. टी 20 क्रिकेटमधले संजू सॅमसनचे हे पहिले अर्धशतक आहे.
दीपक हुड्डा आणि संजू सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत 11 व्या षटकात भारताचे शतक धावफलकावर लावले.
पहिल्या सामन्यात नाबाद 47 धावांची खेळी करणाऱ्या दीपक हुड्डाने दुसऱ्या सामन्यातही दमदार फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली.
सलामीवीर इशान किशन बाद झाल्यानंतर सलामीवीर संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा यांनी पॉवर प्लेमध्ये दमदार फलंदाजी केली. या दोघांनी संघाला 54 धावांपर्यंत पोहचवले.
मार्क एडियरने भारताला तिसऱ्या षटकात पहिला धक्का दिला. त्याने सलामीवीर इशान किशनला 3 धावांवर बाद केले.
भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात संघात तीन बदल केला असून दुखापत झालेल्या ऋतुराज गायकवाडच्या जागी संजू सॅमसन, आवेश खानच्या जागी हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहलच्या जागी रवी बिश्नोईला स्थान देण्यात आले आहे.
भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय टी 20 संघाचे पहिल्यांदाच नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याला पहिलीच मालिका जिंकण्याची संधी आहे. सध्या भारत दोन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 असा आघाडीवर आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.