Ranji Trophy : फलंदाजी अन् गोलंदाजीतील रंजक रेकॉर्ड

Ranji Trophy : फलंदाजी अन् गोलंदाजीतील रंजक रेकॉर्ड

दिल्ली: रणजी ट्रॉफीचा पहिला सामना 87 वर्षापूर्वी 1934-35 साली खेळला होता. रणजी ट्रॉफी साधारण 87 वर्षापूर्वी सुरू झाली. आज अखेर पाच हजार सामने खेळले गेले आहेत. रणजी ट्रॉफीचा हा प्रवास प्रत्येक खेळाडूला आणि चाहत्यांसाठी खास अनुभव देणारा आहे. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात 5000 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. रणजी ट्रॉफी ही भारतातील सर्वोत्तम क्रिकेट चॅम्पीयनशीप आहे. भारतातील राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघामध्ये क्रिकेटचे सामने खेळवले जातात. यामध्ये एकूण 38 संघ सामने खेळतात.

Ranji Trophy : फलंदाजी अन् गोलंदाजीतील रंजक रेकॉर्ड
IND vs SL Live : फिरकीकडून लंका दहन सुरू; 50 च्या आता दोन धक्के

रणजी सामन्यात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम वसीम जाफर याच्या नावे आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित स्पर्धेत 12 हजार 38 धावा केल्या आहेत. हा एक विक्रमच आहे. सर्वाधिक 155 सामने, सर्वाधिक 40 शतके, एकाच वर्षात 7 शतके करण्याचा पराक्रम अशी अनेक विक्रम त्याच्या नावे आहेत.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाचा दबदबा राहिला आहे. मुंबईच्या संघाने सर्वात जास्त वेळा म्हणजे तब्बल 41 वेळा रणजी ट्रॉफीचा किताब जिंकला आहे. काही वर्षापासून मुंबई संघाचा प्रभाव कमी झालेला आहे. मुंबई संघाने शेवटचा किताब 2015-16 या वर्षी जिंकला होता. यानंतर मुंबईचा संघ रणजी सामन्यात अंतिम सामन्या पर्यंत पोहचला नाही. रणजी सामन्यात सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम राजेंद्र गोयल यांच्या नावे आहे. 1958 पासून 1985 पर्यंत 640 विकेट घेण्याचा विक्रम आहे.

Ranji Trophy : फलंदाजी अन् गोलंदाजीतील रंजक रेकॉर्ड
ICC Women's WC: ऑस्ट्रेलियाची वॉर्नला 'विजयी श्रद्धांजली'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com