INDvsWI : कोहली खूश आहे; आज देणार राखीव खेळाडूंना संधी

Reserve players a chance in the third match against West Indies
Reserve players a chance in the third match against West Indies

लॉरेनहील, फ्लोरिडा - वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासह ट्‌वेन्टी-20 मालिका जिंकल्यानंतर उद्या होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी दिली जणार असल्याचे सुतोवाच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केले. रविवारी झालेला दुसरा सामना भारताने डकवर्थ लुईसच्या नियमाने 22 धावांची जिंकला. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघाने पहिल्याच मालिकेत यश मिळवले. त्यामुळे या कामगिरीवर विराट कोहली खुष होता. त्याचवेळी त्याने अखेरच्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते असे मत व्यक्त केले. 

मालिका जिंकलेली असली तरी विजयाला नेहमीच प्राधान्य असते, परंतु अशा मालिका विजयानंतर उर्वरित खेळाडूंना संधी मिळणे क्रमप्राप्त असते. पहिले दोन्ही सामने जिंकल्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली आहे, असे मत विराटने दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर सांगितले. 

ट्‌वेन्टी-20 मालिकेल पहिले दोन सामने अमेरिकेत झाले तर तर उद्याचा तिसरा सामना वेस्ट इंडीजमधील गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर होणार आहे. 

मधल्या फळीतील फलंदाज मुंबईचा श्रेयस अय्यर, राहुल आणि दीपक चहर या बंधूंना उद्याच्या सामन्यात संधी मिळण्याची शक्‍यता आहे, परंतु एकाच वेळी तीन बदल केले जाण्याबाबतही विचार केला जाऊ शकतो. मनिष पांडेने पहिल्या दोन सामन्यात संधी देऊनही निराशा केली होती. त्यामुळे श्रेयसचा पर्याय निश्‍चितच तपासला जाऊ शकतो. 

रिषभ पंतला वगळणार 
महेंद्रसिंगसाठी पर्याय म्हणून वारंवार संधी देण्यात येत असलेला यष्टीरक्षक फलंदज रिषभ पंतने पहिल्या दोन सामन्यात फारच निराशा केली आहे. चार आणि शुन्य अशी कामगिरी त्याने केली आहे त्यामुळे उद्याच्या सामन्यात यष्टीरक्षण करणारा फलंदाज के. एल. राहुलला संधी देण्याबाबतही संघ व्यवस्थापन गंभीर असेल. 

दुसऱ्या सामन्यातील विजयाबाबत बोलताना कोहली म्हणाला, खेळपट्टी सुरवातीला फलंदाजीस चांगली होती. नवा चेंडू बॅटवर व्यवस्थितपणे येत होता. आम्ही भक्कम पायाभरणी केली त्यानंतर रवींद्र जडेजा आणि क्रुणाल पंड्या यांनी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली आम्ही 180 धावांपर्यंतही जाऊ शकतो असतो. मात्र काही काळानंतर खेळपट्टी संथ होत गेली. 

भारतीय कर्णधाराने ऑफस्पिनिर वॉशिंग्टन सुंदरचे कौतूक केले. दोन्ही सामन्यात आम्ही त्याच्याद्वारे आक्रमण सुरु केले ते आव्हान त्याने स्वीकारले. वेस्ट इंडीजच्या आक्रमक सलामीवीरांसमोरची त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. तो चांगली फलंदाजीही करू शकतो त्यामुळे भविष्यात संघासाठी तो उपयुक्त खेळाडू असेल, असे विराट म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com