

Maharashtra Kesari: अहिल्यानगर येथे झालेली ६७ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत रविवारी (२ फेब्रुवारी) मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचे पडसाद अद्यापही महाराष्ट्र कुस्ती वर्तुळात उमटताना दिसत आहेत. पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने प्रतिष्ठीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली. मात्र, त्याने खेळलेले उपांत्य आणि अंतिम सामना वादग्रस्त ठरला.
रविवारी डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला. यामध्ये पंचांनी पृथ्वीराजच्या बाजूने निकाल दिला. पण हा निर्णय शिवराजला अमान्य होता.