भारताची स्टार बॅटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) ही भारतीय महिला संघाच्या कॅप्टन्सीसाठी योग्य चेहरा आहे, असे मत भारताच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी (Shantha Rangaswamy) यांनी व्यक्त केले. मिताली राजच्या नेतृत्वाखालील गत उपविजेत्या भारतीय संघाला यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. महिला वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता मिताली राजनंतर (Mithali Raj) भारतीय महिला संघाची धूरा कोणाकडे जाणार याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
भारतीय संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी स्मृती मानधनाच्या नावाला पसंती दिलीये. स्मृती मानधनाही सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. नेतृत्व करण्याची तिच्यात क्षमताही आहे, असे त्या म्हणाल्या. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय महिला संघाच्या कॅप्टन्सीसंदर्भात शांत रंगास्वामी म्हणाल्या की, मिताली राजनंतर स्मृती मानधनाच संघाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम वाटते. यावेळी त्यांनी हरमनप्रीतवरही भाष्य केले.
हरमनप्रीत ही भारतीय संघातील प्रमुख आणि महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. तिच्यामध्ये सामन्याला कलाटणी देण्याची क्षमताही आहे. पण ती भारतीय संघाचे नेतृत्व करण्यास परिपक्व आहे, असे वाटत नाही. कॅप्टन्सीच्या जबाबदारीमुळे हरमनच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. ती दबावात दिसेल. त्यामुळे स्मृती मानधनानाच योग्य वाटते, असे त्या म्हणाल्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.