स्टेडियमकडे नव्हे, तर प्रशिक्षकांकडे लक्ष द्या

स्टेडियमकडे नव्हे, तर प्रशिक्षकांकडे लक्ष द्या

मुंबई - भारतीय क्रिकेटने मार्गदर्शकांकडे कधीच लक्ष दिले नाही. खेळाडू घडवण्यासाठी मैदाने नव्हेत, तर मार्गदर्शक महत्त्वाचे आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्याची सूचना क्रिकेट सल्लागार समितीने भारतीय क्रिकेट मंडळास केली आहे.

आपण कधीही कपिलदेवला हुडकून काढलेल्या, त्याला घडवलेल्या देशप्रेम आझाद यांच्याकडे लक्ष दिले नाही. प्रथम श्रेणी लढती खेळल्यावर परिपक्वता येते; पण तोपर्यंत नेण्यासाठी मार्गदर्शक लागतात, याकडे क्रिकेट सल्लागार समितीतील व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी लक्ष वेधले. या समितीत सचिन तेंडुलकर तसेच सौरव गांगुलीचाही समावेश आहे.

सचिन तेंडुलकरला शिवाजी पार्कने नव्हे, तर रमाकांत आचरेकर यांनी घडवले. आपण स्टेडियम उभारणीकडे नव्हे, तर दर्जेदार मार्गदर्शक घडवण्याकडे  लक्ष द्यायला हवे. आम्ही  हीच सूचना भारतीय क्रिकेट मंडळासही केली आहे, असे लक्ष्मणने मुंबईतील एका कार्यक्रमात सांगितले.

मामांनी माझ्यातील गुणवत्ता वेळीच ओळखली. त्यांनी मी उच्च स्तरावर खेळू शकतो, याची खात्री आई-वडिलांना पटवून दिली, त्यामुळेच मी खेळू शकलो. किती जणांना ही संधी लाभते. प्रत्येक यशस्वी खेळाडू आपल्याला घडवण्यात मार्गदर्शकांचा, मेंटॉरचा कसा वाटा आहे हेच सांगेल. सचिन शिवाजी पार्कमुळे नव्हे, तर आचरेकर सरांमुळे आहे. आता आपण प्रशिक्षक घडवण्यासाठी गुंतवणूक करायला हवी, असेही लक्ष्मणने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com