T20 World Cup:...तर भारतीय संघाचा डाव अर्ध्यावर मोडणार?

रविवारी होणारा न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकावाच लागणार
india team
india teamsakal media

दुबई : सलामीला पाकिस्तानविरुद्ध झालेला दारुण पराभव भारतीय संघाच्या जिव्हारी तर लागणारा आहेच, पण त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान पुढच्या रविवारी विजय नाही मिळाला तर संपुष्टात येण्याची शक्यता अधिक आहे.एका पराभवाने जग इकडचे तिकडे होणार नाही. पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करा, अशा शब्दांत विराट कोहलीच्या टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु वास्तव वेगळेच दर्शवणारे आहे. स्पर्धेतले आव्हान कायम ठेवायचे असेल तर भारताला येत्या रविवारी न्यूझीलंडविरुद्ध होणारा सामना जिंकावाच लागणार आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारत ब गटात तळाच्या क्रमांकावर आहे आणि निव्वळ सरासरीही -०.९७३ अशी आहे. `सुपर-१२` या मुख्य स्पर्धेतील १२ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येकी सहा संघांतून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. अ गटात एकापेक्षा एक सरस असे संघ असल्यामुळे त्या गटाला ग्रुप ऑफ डेथ असे समजले जात आहे, त्या तुलनेत भारताचा समावेश असलेला ब गट सोपा असल्याचे चित्र आहे, परंतु याच गटात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

असे असेल पुढचे गणित

  • ब गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया हे संघ

  • भारतावरील विजयामुळे पाक सध्या प्रथम

  • पाकचा उद्या न्यूझीलंडविरुद्ध सामना हा सामना पाकने जिंकला तर त्यांचा उपांत्य प्रवेश जवळपास निश्चित (अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियावर विजय अपेक्षित.)

  • त्यामुळे उपांत्य फेरीच्या एका जागेसाठी इतर पाच संघांत स्पर्धा

  • न्यूझीलंडने पाकवर विजय मिळवला तर ते उपांत्य फेरीच्या शर्यतीत

  • भारताचा रविवारी न्यूझीलंडशी सामना आणि हा सामना न्यूझीलंडने जिंकला तर तेही भारतापेक्षा पुढे राहणार.

  • अशा परिस्थितीत भारताने अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंड यांच्यावर विजय मिळवले तरी त्यांचे जास्तीत जास्त ६ गुण.

  • पाकिस्तानने (न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावला असे गृहीत धरले) आणि त्यांनी अफगाणिस्तान, नामिबिया, स्कॉटलंडविजय मिळवले तर त्यांचे ८ गुण

  • न्यूझीलंडने सर्वच साखळी सामने जिंकले तर त्यांचे १० गुण

  • यामध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तान किंवा न्यूझीलंड या पैकी एकाला जरी पराभूत केले तरी त्यांचे गुण भारतापेक्षा अधिकच. शिवाय अफगाणिस्तानही सहा गुणांपर्यंत मजल मारू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com