नागपूर - पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळविण्यात येणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सलामीवीर रोहित शर्मा याच्याकडे सोपविण्यात आले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळविण्यात येणार आहे. आज करण्यात आलेल्या घोषणेनुसार भारतीय फलंदाज शिखर धवन हा तिसऱ्या कसोटी सामन्यासाठीही उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ यातून निवडणार -
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), अक्सर पटेल, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल
|