आम्हाला नंबर वन बनायचं होतं; आता तुम्हीच पाहताय रिझल्ट : विराट कोहली

Virat Kohli praises team india after win against south africa
Virat Kohli praises team india after win against south africa

रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 3-0 विजय मिळवताना केलेला सांघिक खेळ खरच अभिमान वाटावा असा आहे. भारतीय संघाच्या विचारात बदल झालाय त्याचा हा परिणाम आहे. सर्व खेळाडू फक्त संघाचा विचार करून खेळतात. जम बसतो तो फलंदाज संघाला पैलतीरी नेणारी खेळी करतो. रोहित शर्माने मालिकेत केलेली फलंदाजी अफलातून होती. कसोटी सामन्यात सलामीला जाताना करायला लागणारे मानसिक बदल त्याने अंगीकारले आणि फारच मोठ्या खेळ्या उभारल्या. तीच गोष्ट मयांक आगरवालची आहे आणि अजिंक्य रहाणेचीही.

भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास मला वाटते की वेगवान गोलंदाजांच्या विचारात लक्षणीय बदल झालाय. त्यांच्या तंदुरुस्तीत फरक पडलाय. कोणत्याही खेळपट्टीवर प्रभावी मारा करता येतो असा विश्वास त्यांना जाणवू लागला आहे. रांची सामन्यात उमेश यादव आणि महंमद शमीने केलेला मारा काय तिखट होता. दक्षिण आफ्रिकन फलंदाजांची भंबेरी उडवली त्यांनी.


माझा संघ सतत खेळात सुधारणा करण्याच्या ध्यासाने पछाडलेला आहे. आम्ही विजयाचा आनंद घेऊन पण वाहवत जाणार नाही. एक मात्रं नक्की आहे ते म्हणजे भारतीय संघाला भारतात पराभूत करणे किती कठीण झाले याचा अंदाज बाकी संघांना आलेला असेल इतका आपला संघ सर्वांगीण क्रिकेट खेळण्याकडे वाटचाल करू लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com