
राजीव तांबे - साहित्यिक, बालमानसविषयक तज्ज्ञ
परीक्षा संपल्यावर घरात आनंदी वातावरण असते. मुलांना मोकळा वेळ खूप असतो आणि या मोकळ्या वेळेचे काय करायचे, असा गहन प्रश्न पालकांना पडतो, मुलांना नाही. पण रिझल्टची तारीख जवळ येऊ लागली, की काही घरांत ताण निर्माण होऊ लागतो. याला दोन कारणं असतात. एक, पालकांच्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा असतात. दोन, काही बाबतीत मुलंच पालकांना जुमानत नसल्यानं पालक आधीच त्रस्त झालेले असतात. मग रिझल्ट घेऊन मूल घरी आलं, की ‘त्या त्रस्तपणाचा’ उद्रे क होतो. हे कसं टाळता येईल हे जरा समजून घेऊया.