मुंबईची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेचा आज १६८ वा वाढदिवस आहे. भारतातील पहिली रेल्वे ‘१६ एप्रिल १८५३’ या दिवशी खऱ्या अर्थाने धावली. बोरीबंदर ते ठाणे या स्थानकांदरम्यान पहिल्यांदाच ही रेल्वे चालवण्यात आली. या घटनेला आज १६८ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ट्विट करत रेल्वे प्रशासन व प्रवाशांचे आभार मानले आहेत.
"आजच्या दिवशी मुंबई-ठाणे अशी पहिली रेल्वे सेवा १८५३ साली सुरु करण्यात आली. रेल्वे ही गेल्या १६८ वर्षांपासून आपली लाइफलाइन म्हणून काम करतीये. गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वे प्रशासन आणि प्रवासी करत असलेल्या सहकार्याबद्दल प्रत्येकाचे मनापासून आभार", असं ट्विट पीयुष गोयल यांनी केलं आहे.
असा घडला मुंबई-ठाणे रेल्वेसेवेचा पहिला प्रवास
१६ एप्रिल १८५३ रोजी दुपारी ३.३५ वाजता बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली रेल्वे चालवण्यात आली.१४ डब्यांच्या या गाडीत त्यावेळी ४०० प्रवाशांनी प्रवास केला. या रेल्वेला ३३.८ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ५७ मिनिटांचा कालावधी लागला होता. त्यानंतर या सेवेचा विस्तार कल्याण, खोपोली, खंडाळापर्यंत वाढविण्यात आला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.