Personality Tips : आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची लोक वावरत असतात. अनेकांना लग्न करून ते सुखी असल्याचे वाटते तर अनेकांना नातं टिकवताना बऱ्याच अडचणी येतात. काही लोकांचं तर असं होतं की पहिल्या भेटीनंतर लोक त्यांना परत भेटण्यास इच्छुक नसतात. तेव्हा अशांना आपणच का सिंगल आहोत असाही प्रश्न मनातच भेडसावत असतो.
'मी अजूनही अविवाहित का आहे?' या गूढ प्रश्नाचे उत्तर बहुतेक लोक शोधत आहेत. मात्र, सिंगल असण्यामागची चूक तुमची नसून तुमच्यामध्ये काही सवयी आहेत ज्या फार कमी लोकांना त्यांचा जीवनसाथी म्हणून आवडू शकतात.
तुमच्या या सवयी कदाचित तुमच्या लक्षात येत नसतील. त्यामुळे तुम्हाला एकटे वाटणे किंवा तुम्ही सिंगल असणे साहाजिक आहे. तेव्हा याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
कोणत्याही नात्यासाठी जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. कारण काही काळानंतर तुमच्या जोडीदाराला तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे ओझे वाटू शकते. तुमची सदैव इच्छा पूर्ण करणारी व्यक्ती मिळणे खूप अवघड आहे. प्रेम असो किंवा लग्न, लोक नेहमीच त्यांच्या नात्यात द्या आणि घ्या अर्थात तुमच्या वागणुकीप्रमाणे तुमच्याशी वागतील.
जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला खास वाटण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असाल तर तुमचं नात खरंच खास बनू शकतं.
जे लोक त्यांच्या पार्टनरसोबत ओपनली बोलू शकत नाहीत ते एकटे पडतात.अशा वेळी नातं बहरू शकत नाही.
तेव्हा चांगल्या नात्यासाठी जोडप्यामध्ये व्यवस्थित बोलणं असणं फार महत्वाचं आहे. ही सवय तुम्हाला नसेल आणि तुम्ही सिंगल असाल तर पुढल्या व्यक्तीशी तुम्ही एका ओळखीत काहीच बोलू शकणार नाहीत. आणि तुमचं इंप्रेशन डाउन होण्याची शक्यता राहील.
बोलण्यात समंजसपणा असावा
अनेकदा एखाद्या नात्यात गोडवा वाढवण्यासाठी समंजसपणा लागतो. पहिल्यांदा एखादी व्यक्ती तुम्हाला भेटत असेल आणि तुमच्या बोलण्यात समंजसपणा नसेल तर ती व्यक्ती तुम्हाला परत भेटण्यास इच्छुक नसते.तेव्हा तुमच्या या लहान सहान सवयी तुम्हाला वेळेत बदलण्याची गरज आहे. (Relationship Tips)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.