मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर देशाच्या संसदेवर बॉम्बहल्ला होईल- भाजप मंत्री

मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर देशाच्या संसदेवर बॉम्बहल्ला होईल- भाजप मंत्री

लोकसभा 2019 ः गुवाहटी- पुन्हा एकदा भाजप सत्तेत आले नाही आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर पाकिस्तानी लष्कर किंवा दहशतवादी देशाच्या संसदेवर बॉम्बहल्ला करतील, असे वादग्रस्त विधान आसामचे मंत्री हिमांता विश्वा शर्मा यांनी केले आहे. या माध्यमातून हिमांता विश्वा शर्मा यांनी पुन्हा एकदा भाजपाला निवडणून देण्याचे आवाहन केले आहे. 

कामपूरच्या नायगाव येथील एका सभेला संबोधित करताना शर्मा बोलत होते. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आणि आसाममध्ये भाजप सरकार निवडून न आल्यास पाकिस्तानकडून देशाच्या संसदेवर हल्ला करण्यात येईल. तसेच पाकिस्तानी लष्कर किंवा दहशतवाद्यांकडून आसामच्या विधानसभा सभागृहावरही हल्ला होईल आणि त्यावेळी असलेले पंतप्रधान काहीही करू शकणार नाहीत. कारण, पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचं धाडस त्या पंतप्रधानांकडे नसणार आहे, असे म्हणत आसामचे मंत्री हिमांता विश्वा शर्मा यांनी भाजपला मत देण्याच आवाहन केलं आहे. 

त्याचबरोर, नवीन भारतच पाकिस्तानला समर्थपणे उत्तर देऊ शकतो, याच सरकारमध्ये पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचं धाडस आहे, असेही शर्मा यांनी म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा जयघोष करणाऱ्या 130 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस अशा लोकांना पाठिशी घालत असल्याचेही शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, भाजप नेत्यांची बेताल वक्तव्य किंवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना संबोधित करताना भीती दाखविण्याचे काम सुरू केल्याची चर्चा सध्या नेटीझन्समध्ये सूरु झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com