Loksabha 2019 : 'नेत्यांना निवृत्तीचे वय नसते'

sumitra mahajan
sumitra mahajan

नवी दिल्ली: राजकारण आणि सरकारी नोकरी यांची तुलना होऊ शकत नाही, सरकारी कर्मचाऱ्याला ठराविक काळानंतर निवृत्त व्हावे लागते. मात्र, राजकीय नेत्यांचे तसे नसते, असे मत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी एका मुलाखतीतदरम्यान व्यक्त केले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील एका विद्यार्थी संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यावेळी तेथील एका विद्यार्थ्यांने राजकारणात नेत्यांनी कधी निवृत्त व्हावं असं तुम्हाला वाटते? असा प्रश्न राहुल यांना विचारला होता. त्यावर राजकारणात निवृत्तीसाठी 60 वर्ष असावे, असे माझे वैयक्तिक मते असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले होते.

महाजन म्हणाल्या, 'राजकारणाशी तुलना सरकारी नोकरीसोबत केली जाऊ शकत नाही. सरकारी नोकरीमध्ये निवृत्तीचे वय ठरलेलं असते. मात्र, राजकारणात तसे होत नाही. कारण राजकीय नेता थेट जनतेच्या सुख-दुखा:त सहभागी असतो. जनतेची सेवा करताना त्याला वेळेचे बंधन नसते. मोरारजी देसाई हे वयाच्या 81 व्या वर्षी देशाचे पंतप्रधान झाले होते.'

लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय सुमित्रा महाजन यांनी घेतला आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या, 'गेली 5 वर्ष मी लोकसभेची अध्यक्ष असल्याने भाजपच्या कोणत्याही बैठकीत उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे वय झालेल्या नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय भाजपच्या कोणत्या बैठकीत पारित झाला याची कल्पना मला नाही. मात्र, माझे इतकंही वय झाले नाही की मी राजकीय जीवनातून सन्यास घेईन. मी प्रामाणिकपणे भाजपचे काम करत राहील.'

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांना तिकीट नाकारल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. याच दरम्यान सुमित्रा महाजन यांनी हे वक्तव्य केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com