Loksabha 2019 : मुंबई राखणार तो दिल्ली जिंकणार 

Loksabha 2019 : मुंबई राखणार तो दिल्ली जिंकणार 

मुंबई -  "मिनी भारत' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत ज्या पक्षाचे सर्वांत जास्त खासदार येतात तोच दिल्लीची गादी मिळवतो, हा गेल्या तीन दशकांतील इतिहास आहे. एकट्या ईशान्य मुंबईतून एकही उमेदवार सलग दुसऱ्या वेळी निवडून आलेला नाही. त्यामुळे मुंबईतून जास्त जागा कोण मिळवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुंबईत देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यांतून प्रत्येक भाषेचा जातीचा, धर्माचा नागरिक वसला आहे. त्यात मराठीबरोबरच हिंदी भाषक, मुस्लिम, गुजराती, मारवाडी यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा देशाचा कौल मानला जाऊ शकतो. 1998 पासून मुंबईत अशीच परिस्थिती आहे. ज्या पक्षाला मुंबईत जास्त जागा मिळाल्या त्याच पक्षाचा पंतप्रधान होतो, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. 

1999 मध्ये भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा मुंबईत शिवसेना-भाजप युतीने पाच जागा जिंकल्या होत्या. तेव्हा कॉंग्रेसचे फक्त सुनील दत्त मुंबईतून निवडून आले होते. तेव्हापासून मुंबई राखणाराच देशात सत्ता स्थापन करण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. त्यामुळे आता मुंबईतून कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ईशान्य मुंबईत सलग दोन वेळा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. या मतदारसंघातून कॉंग्रेसचे नेते गुरुदास कामत निवडून आले होते. मात्र, ते एकदाही सलग निवडून आले नाहीत. 2004 मध्ये कामत आणि 2009 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय पाटील निवडून आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com