वीस मतदारसंघांत ऊसबिल कळीचे...

Sugarcane
Sugarcane

माळीनगर ( जि. सोलापूर) - लोकसभा निवडणुकीत राज्यातील २० मतदारसंघांत ऊसबिलाचा मुद्दा कळीचा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
यंदाचा साखर हंगाम मार्चअखेर संपण्याचा अंदाज आहे. अशातच लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू झाला आहे. राज्यातील साखर कारखान्यांकडे ५,७५९ कोटी रुपये ऊसबिलाची बाकी असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हा मुद्दा पश्‍चिम महाराष्ट्रात उचलून धरण्याची शक्‍यता आहे. 

भारत आणि ब्राझीलमध्ये यंदा साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने साखर विक्री मंदावली आहे. त्यामुळे केंद्राने निश्‍चित केलेली उसाची ‘एफआरपी’ देणे कारखान्यांना अवघड झाले आहे.

 ‘स्वाभिमानी’मुळे थकबाकी कमी करण्यास यश
 देशात ऊसबिलाची २३ हजार कोटी रुपये बाकी आहे. ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात साखर आयुक्तांनी ऊसबिलाबाबत कठोर पावले उचल्याने थकबाकी कमी करण्यात यश आले आहे. राज्यात ऊसबिलाची ७३ टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com