Loksabha 2019 : काँग्रेसला लाज कशी वाटली नाही? - देवेंद्र फडणवीस

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

सोलापूर - देशातील गरिबी हटविण्याची पहिली घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आजोबांनी केली होती. त्यानंतर अनेक वर्षांनी काँग्रेसच्या अध्यक्षांना पुन्हा ‘गरिबी हटाव’ची घोषणा करताना लाज कशी वाटली नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी अक्कलकोट येथे आज विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, की काँग्रेसने केलेले घोषणापत्र खोटारडे आहे. देशातील लोक त्याला भुलणार नाहीत. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की ते आपल्या भाषणात काय बोलतात, हे कळतच नाही. टीव्हीवर ज्या पद्धतीने एखाद्या मालिकेपूर्वी या कार्यक्रमाचा काही संबंध प्रत्यक्षात कुणाच्या आयुष्यात आला, तर तो योगायोग समजावा, असे दाखविले जाते. नेमके त्याच पद्धतीने केवळ मनोरंजन करणारे भाषण राहुल करतात.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कलम १२४ अ हे रद्द करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. हे कलम देशद्रोहाच्या गुन्ह्यासंबंधी आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे हा जाहीरनामा काँग्रेसचा नसून ‘जैशे महंमद’ याचा असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com