Loksabha 2019 : शिवसेना २०-२१ जागांवर जिंकणार?

Shivsena
Shivsena

मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातील २३ पैकी २० ते २१ जागा जिंकण्याचा शिवसेना नेत्यांना अंदाज आहे. यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत ‘मातोश्री’ला दोन भेटी दिल्या असून, यापुढे त्यांचे मुंबई दौरे वाढणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

प्रशांत किशोर यांनी ‘मातोश्री’वर पहिली भेट दिल्यानंतर शिवसेना-भाजप युती आकारास आली होती. या भेटीत त्यांनी निवडणूक जिंकण्याचे फंडे शिवसेना नेत्यांना दिले होते. तसेच स्टॅटेजी ठरविण्यासाठी शिवसेनेला सहकार्य करण्याचेही त्यांनी घोषित केले होते. २०१४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी प्रशांत किशोर यांनी निवडणूक रणनितीकार आणि तज्ज्ञ म्हणून काम केले होते. तेव्हापासून  त्यांचा राजकीय वर्तुळात वावर सुरू होता. गेल्या महिन्यात प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली होती. दरम्यान, शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या २३ जागांचा आढावा घेतला जात आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या पूर्वीच्या १८ जागांपैकी रायगडमधील जागा धोक्‍याची असल्याचे चित्र आहे. शिवसेनेतील गिते यांना असलेला अंतर्गत विरोध लक्षात घेता ही जागा शिवसेनेकडून गमावली जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मात्र बदलेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला कोल्हापूर, पालघर आणि हिंगोली या नवीन जागा मिळण्याची खात्री आहे. म्हणजेच पूर्वीच्या १८ पैकी १७ आणि नवीन तीन जागा मिळण्याच्या शक्‍यनेते शिवसेना नेते सुखावले आहेत.

चार ठिकाणी कडवी झुंज
दरम्यान, शिवसेनेच्या कोट्यातील चार जागांमध्ये कडवी झुंज होणार आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादीने डॉ. अमोल कोल्हे आणि मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेसोबत कडवी झुंज होणार आहे. परभणी व उस्मानाबादमध्ये शिवसेनेला अटीतटीचा सामना करावा लागणार आहे.

चौकीदार शब्दांबाबत ठाकरेंचा यू-टर्न
मुंबई - पंढरपूर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चौकीदार चोर है’ अशा शब्दांत संभावणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यू-टर्न घेतला आहे. लोकसभा निव्वडणुकीच्या प्रचारसभेत ठाकरे यांनी चौकीदार शब्दाचे कौतुक केल्याने विरोधकांकडून त्यांची कोंडी केली जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी भाजप नेत्यांवर स्तुतिसुमने उधळण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी नाशिकच्या सभेतील आपल्या भाषणाची सुरवात ‘महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री’ म्हणत सुरवात केली होती.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधील अग्रलेखात गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे कौतुक करताना पर्रीकर हे गोव्याचे सक्षम चौकीदार होते, असे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com