Loksabha 2019 : राज्यात ९१ हजारांहून जास्त मतदान केंद्रे

Voting
Voting

मुंबई - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. सध्या मतदारांची नावनोंदणी सुरू असल्याने मतदान केंद्रे वाढण्याची शक्‍यता आहे.

२००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण ६४ हजार ५०८ मतदार केंद्रे होती. २००९ मध्ये एकूण ८३ हजार ९८६ मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. २०१४ मध्ये एकूण ९१ हजार ३२९ मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीमध्ये ९५ हजार ४७३ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येतील. यामध्ये ग्रामीण भागात ५५ हजार ८१४ तर शहरी भागात ३९ हजार ६५९ मतदान केंद्रे असतील.

मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिद्धी, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्‍चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत 
घेण्यात येतो. 

मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होऊ नये याची काळजी आयोगामार्फत घेण्यात येते. मतदार केंद्रांची संवेदनशीलता बघून त्या ठिकाणी आवश्‍यक सुरक्षा पुरविण्यात येते.

मार्गदर्शक तत्त्वे
    किमान आठ प्रकारच्या मूलभूत सुविधा बंधनकारक 
    वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा
    व्हीलचेअरवरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर 
    दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर विशेष काळजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com