Loksabha 2019 : राजीव सातवांच्या माघारीने पक्षांतर्गत समीकरणे बदलणार

Rajiv-Satav
Rajiv-Satav

कळमनुरी - हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार ॲड. राजीव सातव यांनी निवडणुकीमधून माघार घेतल्यामुळे आगामी काळामध्ये पक्षांतर्गत सर्व राजकीय समीकरणे बदलणार असल्‍याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर काँग्रेसकडून विद्यमान खासदार ॲड. राजीव सातव यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, त्यानंतरही पक्षाकडून उमेदवारी जाहीर करताना झालेला विलंब व उलट-सुलट चर्चा पाहता काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात होते. अखेरच्‍या क्षणी खासदार श्री. सातव यांनी पक्षाने आपणाकडे दिलेली जबाबदारी पाहता लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते हताश झाले आहेत. मतदारसंघात श्री. सातव यांनी पक्षबांधणीबरोबरच वैयक्तिक संपर्कातून कार्यकर्त्यांची फळी उभी केलेली आहे. त्यांना मानणारा मोठा गट तालुका व संपूर्ण लोकसभा मतदारसंघात आहे.

त्यामुळे खासदार श्री. सातव हे निवडणुकीमधून माघार घेतील, हे कुठल्याही कार्यकर्त्याला रुचले नाही. श्री. सातव हे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विश्वासू वर्तुळामधील सदस्य असल्यामुळे पक्षाच्या अनेक निर्णयात त्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. त्‍यांनी आपल्या कार्यप्रणालीद्वारे स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. पक्षश्रेष्ठींकडे त्यांची वैयक्तिक असलेली जवळिक पाहता पक्षांतर्गत अनेक मातब्बर धुरिणांना नाईलाजास्तव त्यांचे वर्चस्व सहन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच आता काँग्रेसकडून त्यांच्यावर अजून मोठी जवाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ॲड. राजीव सातव यांची भूमिका अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्णायक राहणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com