परभणी - राफेल व्यवहारातील लोणी कोणी खाल्ले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी केला. नोटाबंदीचा दुर्दैवी निर्णय घेतल्यानंतर देशातील हजारो कंपन्या बंद पडून १५ लाख लोकांच्या नोकऱ्या घालविण्याचे महापातक मोदी सरकारने केले, असा आरोप शरद पवार यांनी केला. लोकसभेच्या परभणी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ आज येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते.डॉ. मनमोहनसिंग सरकाराच्या काळात राफेल विमानाची किमंत ३५० कोटी रुपये असताना मोदी सरकारने एक हजार ६६० कोटींवर कशी नेली? या व्यवहारातील लोणी कोणी खाल्ले हे सर्वसामान्य माणसाला समजले आहे. कोणताही अनुभव नसताना, कारखाना तयार नसताना उद्योगपती अंबानी यांना विमान तयार करण्याचे काम देण्यात आले. त्यावरून हे सरकार उद्योगपती, भांडवलदारांचे आहे, हे स्पष्ट झाल्याचा आरोप पवार यांनी केला.
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानच्या तावडीतून सोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव असल्याने अभिनंदन यांची सुटका झाली. परंतु, त्यांच्या सुटकेचे श्रेय घेण्यास मोदी सरकारने मागेपुढे पाहिले नाही.
- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.