Loksabha 2019: 'वसंतदादांच्या वारसांनी स्वाभिमान शिल्लक असेल तर भाजपमध्ये यावे'

Loksabha 2019: 'वसंतदादांच्या वारसांनी स्वाभिमान शिल्लक असेल तर भाजपमध्ये यावे'

सांगली : वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारेच मागच्या दाराने आता त्यांच्या कुटुंबियांची उमेदवारीही काढून घेत आहेत. पडायचेच असेल तर आता दादांच्या वारसांनी जरुर निवडणूक लढवावी. मात्र स्वाभिमान जागा असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावे आम्ही पायघड्या घालून त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज औदुंबर येथे केले. खासदार संजय पाटील यांच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, सांगलीत आज कॉंग्रेसला उमेदवारच नाही. दादांच्या कुटुंबियांची उमेदवारी काढून घेतली जात आहे. त्यामागे दादांच्या पाठीत खंजीर खुपसणारेच आहेत. वसंतदादांचे राज्यावर अनंत उपकार आहेत. त्यांची पाणी अडवा पाणी जिरवा योजना आमच्या सरकारने जलयुक्त शिवार नावाने चालवली. त्यांच्यामुळेच गरीबांची मुले उच्चशिक्षित झाली. आमचेही वसंतदादांवर प्रेम आहे. त्यांच्या वारसांबद्दल आम्हाला सहानभुती आहे. त्यांनी जरुर आमच्यासोबत यावे. त्यांचे स्वागतच असेल.'' 

खासदार राजू शेट्टी यांच्यावर आसूड ओढताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेट्टींना आघाडीकडे आठ जागा मागितल्या आणि आता एकमेव हातकणंगले जागेवर समाधान मानत आहेत. मग तुम्ही तिकडे जाऊन काय मिळवले? सगळे मलाच पाहिजे हा तुमचा अट्टाहास.

बुलढाणा किंवा शिर्डीची जागा तुम्ही घेतली असती तर आम्ही समजू शकलो असतो. आमचा मित्र रविकांत तुपकर याच्यासाठी तुम्ही जागा घ्यायला हवी होती. त्यांना वाऱ्यावर सोडून तुम्ही आपला स्वार्थ पाहिलात. मात्र आता तुमचा शेतकऱ्यांच्या कैवारीपणाचा बुरखा आम्ही फाडणार आहोत. वेळ आली की तुमच्या साऱ्या भानगडी आम्ही बाहेर काढू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com