Loksabha 2019 : सरकारने धनगर समाजाला फसविले : पवार

Government misled Dhangar community says Sharad Pawar
Government misled Dhangar community says Sharad Pawar

नगर : ''भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला आश्वासने दिली. धनगर समाजाचा प्रश्न निवडून आल्यावर एकाच आठवड्यात सोडवू, असे जाहीर सांगितले. मात्र हा प्रश्न अद्यापही भिजत पडला आहे. या समाजाची सरकारने फसवणूक केली,'' अशी टीका राष्ट्रवादी काॅंगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

नगरच्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ काॅन्फरन्सीद्वारे बोलताना पवार यांनी आपली दिशा स्पष्ट करीत भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ``या सरकारने शैक्षणिक सवलती देवू केल्या होत्या. एकाही प्रश्नाची सोडवणूक चांगल्या पद्धतीने केली नाही. शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा खुद्द पंतप्रधानांनी केली. जलपूजनही केले. मात्र काम केले नाही. महाराजांच्या बाबतीत अशी स्थिती तर सर्वसामान्यांचे काय?`` असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.

आमच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत केली होती. दुष्काळात शेतकरी जगविला होता. या सरकारने मात्र केवळ घोषणांचा पाऊस पाडला. या सरकारच्या काळात १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नोटाबंदीमुळे १५ लाख लोकांची नोकरी गेली. धंदे बंद पडले. देशातील भ्रष्टाचार वाढतच चालला आहे. अधिकाऱ्यांना दक्षिणा दिल्याशिवाय कामे होत नाहीत, हा कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. काळा पैसा बाहेर करण्याच्या नादात अर्थव्यवस्था खालावली, असा आरोप पवार यांनी केला.

दाल मे कुछ काला है -
``राफेल प्रकरणात सकारने माहिती लवविली आहे. संरक्षण खात्यातील कागदपत्रे हरवतात कसे. चोरीला जातात कसे. असे असते तर सरकारने पोलिस केस का नाही केली. त्यांची तशी जबाबदारी नव्हती का. त्यामुळे चोरी करणारे हे कुठले बाहेरचे नाहीत, हे स्पष्ट होते. दाल मे कुछ काला है,`` अशा शब्दांत पवार यांनी सरकारविषयी शंका व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com