Loksabha 2019 : ‘विधानसभा’ इच्छुकांची ‘लोकसभा’ कसोटी

Udayanraje-Narendra
Udayanraje-Narendra

सातारा - भारतीय जनता पक्षाने यंदाची लोकसभेची निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे कालच्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे युतीचे हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस कसे पेलणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

सत्तेत आल्यापासूनच भाजपने जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जिल्ह्याची मुख्य जबाबदारी होती. त्यानुसार त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचे संघटन वाढविण्यावर भर दिला. तशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या. त्यातून जिल्ह्यात भाजपचे चांगले जाळे तयार झाले. भाजपबाबत जिल्ह्यात चांगले वातावरण निर्माण करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात चांगली ताकद निर्माण करण्यात यश आले. मात्र, लोकसभा निवडणूक ताकदीने लढविली, तर त्याचा विधानसभा निवडणुकांत उपयोग होईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी उमेदवार देण्याचा भाजपचा सुरवातीपासूनच मनसुबा होता. त्याच कारणाने युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे असली, तरी शेवटपर्यंत घोळ मिटत नव्हता.

मतदारसंघ मिळविण्याचे भाजपचे प्रयत्न सुरूच होते; परंतु जागा शिवसेनेकडेच राहिली; परंतु जागा मिळाली नसली, तरी उमेदवार आपला राहावा या दृष्टीने भाजपने प्रयत्न केले. त्या माध्यमातून साताऱ्यात आपला उमेवार पाहिजेच हा मुद्दा भाजपने खरा केला. त्यातून भाजपमध्ये असलेल्या नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना उमेदवारीही मिळाली. या सर्व घडामोडींकडे पाहता शिवसेनेची हा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपवर सर्वाधिक असणार होती. त्याची प्रचिती नरेंद्र पाटील यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत आलीच; परंतु भाजपच्या या मनसुब्यांना अडचण होती ती उदयनराजेंच्या आजवरच्या राजकीय कार्यपद्धतीची.

उदयनराजे राष्ट्रवादीत असले, तरी आजपर्यंत त्यांनी कधी मनाने राष्ट्रवादी असल्याचे दाखविले नाही. पक्षापेक्षा इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे नेहमीच चांगले संबंध राहिले. त्यांची कामे करण्याला त्यांनी प्राधान्य दिली. त्यामुळे सर्वच पक्षात त्यांना मानणारा वर्ग आहे.

साताऱ्यातील भाजपही एकप्रकारे उदयनराजेप्रेमी असल्याचा प्रत्येक अनेक घटनांतून समोर आलेला आहे. अन्य तालुक्‍यांमध्येही काही- अधिक प्रमाण उदयनराजेंच समर्थ भाजप व शिवसेनेत आहेत. त्यामुळे नरेंद्र पाटलांना निवडून आणण्यासाठी वरच्या नेत्यांनी कंबर कसली असली, तरी प्रत्यक्ष मैदानात काम करणारे शिलेदार काय करतील असा प्रश्‍न होता. युतीच्या उमेदवाराच्या दृष्टीने हा सर्वाधिक कळीचा मुद्दा होता.

भाजपच्या धुरीणांनीही तो ओळखला. त्या दृष्टीने पक्षाने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे बौद्धिक देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला. तो काल झाला. यामध्ये चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांची चांगलीच झडती घेतली. त्यातून युतीचे इरादे स्पष्ट झाले आहेत. प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने पक्षाचे काम करेल याकडे लक्ष दिले जाणार आहे. लोकसभेला मिळणाऱ्या मताधिक्‍यावरच त्या- त्या तालुक्‍यातील किंवा  विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची मदार असणार आहे, तसेच पक्षात आलेल्यांच्या निष्ठेची तपासणीही होणार आहे. त्यातून युती ताकदीने मैदानात उतरणार 
असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नाराजीवर अन्य पक्षांच्या मैत्रीचा उतारा देणाऱ्या उदयनराजेंसमोर आव्हान निर्माण होणार आहे. ते त्यावर कसा मार्ग काढणारे हे आगामी काळात पाहावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com