‘स्वाभिमानी’चा कल आज होणार स्पष्ट

Raju-Shetty
Raju-Shetty

जयसिंगपूर - लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केल्यानंतर केवळ चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. आगामी निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (ता. २८) होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून अद्याप संघटनेच्या मागणीला प्रतिसाद मिळाला नसल्याने राज्य कार्यकारिणी सदस्यांचे मत लक्षात घेऊन आघाडीच्या वाटाघाटी की स्वबळ लढविणे, यावर ठोस निर्णय बैठकीत होण्याची शक्‍यता आहे.

आघाडीत सामील होण्याआधी ‘स्वाभिमानी’ने हातकणंगले, बुलडाणा आणि वर्धा लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्‍नी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा करून सबुरीचा सल्ला देत याप्रश्‍नी सकारात्मक भूमिका घेण्याची ग्वाही दिली होती.

मात्र, प्रत्यक्षात ठोस निर्णय बुधवारी सायंकाळपर्यंत स्वाभिमानीला दिला नसल्याने तीन जागांबाबत आता कार्यकर्त्यांच्या मनात पाल चुकचुकत आहे. आघाडीच्या निर्णयाची १५ दिवसांपासून प्रतीक्षा केली जात असताना, निवडणुकीच्या तोंडावर आता तयारीला लागले पाहिजे, अशीही मानसिकता कार्यकर्त्यांची झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com