Loksabha 2019 : खासदार शेट्टी झाले काटामारीतले भागीदार : मंत्री सदाभाऊ खोत

Minister of State for Agriculture Sadabhau Khot criticised MP Raju Shetty
Minister of State for Agriculture Sadabhau Khot criticised MP Raju Shetty

लोकसभा 2019
सांगली : काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना 'आली बाबा चाळीस चोर' असे म्हणणारे स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी आता चोरांच्या टोळीचे भागीदार बनले आहेत, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केली. वर्षानुवर्षे काटा मारणाऱ्या कारखानदारांविरोधात लढाई करणारे शेतकऱ्यांचे नेते मग, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पंगतीला बसून काटा मारण्याचा हिस्सा मागायला गेलेत का? असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
 
भाजपचे लोकसभा उमेदवार खासदार संजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कृषी राज्यमंत्री श्री. खोत सांगलीत आले होते. त्यावेळी श्री. खोत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्तापिपासू विरुध्द जनता अशी निवडणूक आहे. मात्र त्यामध्ये जनतेचा विजय होईल स्वाभिमानीचे नेते शेट्टी यांचा सध्या संयम सुटलेला आहे. त्यामुळे बेताल वक्तव्य करू लागले आहेत. तुम्ही अडीच वर्षे कोणासोबत होता याचा विसर पडला आहे. शेट्टींचा कोणता पक्ष भरायचा शिल्लकच राहिला नाही. अगदी वंचित बहुजन आघाडी सोबतही त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली होती. मात्र तिथं काही जमत नसल्याने परंपरागत विरोधक असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पंक्तीला बसणे त्यांनी पसंत केले आहे. वर्षानुवर्षे शेट्टी यांच्याकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना अलीबाबा चाळीस चोर अशी टीका करीत होते. मात्र या चोरांच्या टोळीचे शेट्टी भागीदार बनले आहेत.'' 

ते म्हणाले, "शेट्टींनी खासदार फंडातून वजन काटे उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. पाच वर्षाचा कालावधी संपला तरी वजन काटे बसवण्यात आले नाहीत. उसाचा काटा मारणाऱ्या विरोध लढाई करणारे शेट्टी आता कारखानदारांनी मारलेल्या काट्याचा हिस्सा मागायला गेले आहेत. हे आता हातकणंगले येथील जनतेलाही समजलेले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत राहून बुलढाणा आणि वर्धा या दोन लोकसभेच्या जागांची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली, त्यापैकी एक ही जागा देण्यात आली नाही त्यामुळे आघाडीमध्ये शेट्टींचे काय स्थान आहे हे समजलेले आहे.' अशी टीकाही राज्यमंत्री खोत यांनी यावेळी केली. 

वेद वदवून घेणाऱ्याने शेपूट धरले -
ऊस दराबाबत खासदार शेट्टींनी पंढरपूर ते बारामती पदयात्रा झाली. त्यावेळी त्यांनी बारामतीत जाऊन रेड्याच्या तोंडातून वेद वदवून घेणार, असे असे शरद पवार यांना आव्हान दिले होते. मात्र सध्या शेट्टींची परिस्थिती बदलल्याने आता ते त्यांचे शेपूट धरून राजकीय भवितव्यासाठी चाचपडत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com